HW News Marathi
महाराष्ट्र

तेलंगणा राज्याप्रमाणे राज्यातील शेतक-यांना मोफत वीज द्यावी – धनंजय मुंडे यांची मागणी

विदर्भातील संघर्ष यात्रेमुळेच कर्जमाफीची अंमलबजावणी होऊ लागल्याचा दावा
नांदेड महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या छोट्याशा तेलंगणा राज्याला कर्जमाफी ही देता येते आणि मोफत वीज हि देता येते , महाराष्ट्रात मात्र कर्जमाफीची घोषणा होऊनही त्याची नीट अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे सरसकट कर्जमाफीही द्यावी आणि तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना मोफत वीज द्यावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने 16 जानेवारीपासून मराठवाड्यात काढण्यात येणा-या हल्लाबोल यात्रेच्या पूर्वतयारीसाठी मुंडे आज नांदेड ते आले होते कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. शेतकऱ्यांना वाढीव दिलेली विजेची बिले ही मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली .
कापसावरील बोन्ड अळीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल जाहीर केलेली मदत फसवी आहे. बियाणे कंपन्या मदत देण्यास तयार नाहीत त्या मोन्सेटो कंपनी कडे बोट दाखवत आहेत , ही कंपनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाईल मग शेतक-यांना मदत केंव्हा मिळणार ? असा सवालही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.
या यात्रेदरम्यान नांदेड जिल्ह्यात लोहा , उमरी व माहूर अशा 3 ठिकाणी सभा होणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस माजी मंत्री कमलकिशोर कदम, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर, आ.विक्रम काळे, माजी खासदार गंगाधरराव कुंटुरकर, माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, महिला आघाडीच्या राष्ट्रीय सरचिटणीस सौ.सोनालीताई देशमुख, शहराध्यक्ष डॉ.सुनिल कदम विक्रम देशमुख, फिरोज लाला, किशोर देशमुख आदी उपस्थित होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

फोन टॅपिंगचे आदेश देणारे रश्मी शुक्लांचे ‘बिग बॉस’ कोण? – अतुल लोंढे

News Desk

सुशांतसिंग प्रकरणाचा तपास डॉ नरेंद्र दाभोळकरांसारखा होऊ नये, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

हिंगणघाट जळीत कांड : पीडितेच्या मृत्यूनंतर राज्यभरात तणावाचे वातावरण

swarit
मुंबई

फडणवीस सरकारचे सर्वच आलबेल, सामना,तून टीका

News Desk

भीमा कोरेगाव आणि कमला मिल कंपाऊंड जळित हत्याकांडावरून शिवसेनेने मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. राज्यात एवढया मोठया घटना होऊनही मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्था उतम आहे असे म्हणतात.

म्हणजे सर्व अलबेला आहे असे टोला सेनेने लगावला आहे. कमला मिल आगीप्रकऱणी मुंबईच्या आयुक्तावर दबाव टाकला जात आहे. आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. सरकाकडून या सर्व प्रकऱणांची चौकशी सुरू आहे. व ती चौकशी शांतता, कोर्ट चालू आहेच्या धर्तीवर शांतता, चौकशी चालू आहे, अशा पद्धतीची नाही हे एव्हाना लक्षात आले असेल, असे म्हटले.

Related posts

मुंबईत डेंग्यूचे पाच तर लेप्टोचा एक बळी, आरोग्य खात्याचा अहवाल

swarit

मनसे विभागप्रमुखावर हल्ला करणा-यांना अटक

News Desk

टॅक्सी चालकावर ‘मनसे स्टाईल’ कारवाई, रस्त्यावर उठाबश्या काढण्याची शिक्षा

News Desk