HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्रात आता ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशात लागू केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार आहे. मात्र, त्यानंतर काय ? असा प्रश्न गेले अनेक दिवस विचारला जात होता. याच पार्श्वभूमीवर, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (११ एप्रिल) महाराष्ट्रात १४ एप्रिलनंतरही लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यात पुन्हा १४ एप्रिलपासून ते ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार असल्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यातील ‘कोरोना’रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यासाठी ही आताची अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे.

“आपल्याला ही लढाई जिंकायचीच आहे”, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणखी वाढविण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे, शाळा-महाविद्यालये यांसह अन्य सर्व परीक्षा व उद्योगधंद्यांबद्दलची सर्व उत्तर ही १४ एप्रिलनंतर देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील जनतेला केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Nirbhaya Case : आरोपींच्या फाशीला अनिश्चित काळासाठी स्थगिती

swarit

भाजपमध्‍ये प्रवेश करणे हाच राहुल गांधींसमोर शेवटचा पर्याय, निलेश राणेंनी डिवचलं

News Desk

काश्मीरमध्ये ५ जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद

News Desk