HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची भूमिका घेतली नसती तर न्यूयॉर्क सारखी अवस्था झाली असती

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सामना या वृत्तपत्रात मॅरेथॉन मुलाखत घेतली. शरद पवार यांची ही ऐतिहासिक मुलाखत आणि त्याचे प्रोमो संजय राऊत त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून पोस्ट करत होतेच. आणि आज त्या मुलाखतीचा पहिला भाग प्रदर्शित झाला. यात त्यांनी अनेक मुद्द्यावर चर्चा केली आणि मुख्य म्हणजे त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. सुरुवातीला त्यांना राज्यात, जगात सध्या कोरोनाचे जे संकट आले आहे त्याबद्दल आणि त्यामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनबद्दल प्रश्न विचारण्यात आले.

सध्या नक्की काय चाललं आहे? यावर त्यांनी सांगितले. की काही खास नाही. एक तर देशात आणि राज्यात काय सुरू आहे याकडे लक्ष देणे आणि वेगवेगळ्या लोकांशी सुसंवाद साधणे. अगदी राजकारणा बाहेरच्या लोकांशी मी बोलतोय असे ही त्यांनी म्हटले. पुढे लॉकडाऊन बद्दल ते म्हणाले की, संकट तर आहेच मात्र त्यातून जे चांगलं करता येईल ते करणं गरजेचे आहे. समजा हा लॉकडाऊनचा काळ नसता, हे संकट नसतं तर कदाचित माझ्याबद्दल वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं.

लॉकडाउनच्या कालावधीमध्ये पहिल्या दीड महिन्यात मी घराच्या चौकटीच्या बाहेरही गेलो नाही, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये तुम्ही वेळ कसा घालवला या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी आपल्या वयाच्या संदर्भ देत घरच्यांनी काळीज घेण्यासंदर्भात केलेला आग्रह आणि मनावरील दडपणामुळे आपण पहिला दीड महिना घराबाहेरच न पडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली, या मुलखतीत शरद पवार यांनी लॉकडाउनच्या काळात काय केलं यासंदर्भात बोलताना ही माहिती दिली.

सुरुवातीच्या काळात लॉकडाऊन कठोरपणे करणं गरजेचे होते. त्याची अंमबजावणीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झाली. तशी भूमिका घेतली नसती तर न्यूयॉर्क सारखी अवस्था झाली असती.ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत पुर्ण तळाला जाईल आणि पुन्हा सर्व काही हळूहळू पूर्वपदावर येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येणार असली तरी कोरोना पूर्णपणे संपला असं समजण्याचं कारण नाही असंही म्हटलं आहे. कोरोना हा दैनंदिन जीवनाचा भाग होणार आहे हे मान्य करुनच आपण पुढील वाटचाल केली पाहिजे असेही पवार म्हणाले.

लॉकडाउनचा प्रश्न मात्र चिंताजनक परिस्थिती निर्माण करतो, असं सांगतानाच परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाही काळजी घेणं गरजेचं असल्याचं पवार म्हणाले आहेत. कोरोनासोबत जगावं लागेल मात्र लॉकडाउनसहीत जगावं लागेल असं मला वाटतं नाही. “मी काही तज्ज्ञांशी बोललो त्यांच्या सांगण्यानुसार साधारणपणे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून तो ट्रेण्ड (कोरोनाचा आलेख) खाली जाईल. ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत पुर्ण तळाला जाईल आणि पुन्हा नॉर्मलन्सी येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ६७८ नवीन रुग्णांचे निदान, एकूण कोरोना बाधितांची संख्या १२ हजार ९७४ वर

News Desk

केंद्रात आणि राज्यात एकोपा असताना काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत !

News Desk

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना कोरोनाची लागण

News Desk