HW News Marathi
Covid-19

सांगलीतील लॉकडाऊन आणखी ३ दिवस वाढला !

सांगली | सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊन आता आणखी ३ दिवसांनी वाढविण्यात आल्याची माहिती सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात 5 मे पासून 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन पाळण्यात आला याचा परिणाम म्हणून जरी कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला नसला तरी ३० टक्‍क्‍यांपर्यंत स्थिर झाला आहे. मात्र, हा पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा जास्त असून त्यामध्ये घट करण्याच्या दृष्टीने सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून जिल्ह्यात आणखी ३ दिवस म्हणजे येत्या 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असून परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय सोमवारी (१७ मे) घेण्यात येईल”, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

१७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय !

सांगली जिल्ह्यात पाळण्यात आलेल्या लॉकडाउनचा आढावा घेऊन कोरोना सद्यस्थितीचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज (१५ मे)ऑनलाइन बैठकीद्वारे घेतला. पालकमंत्री जयंत पाटील यावेळी म्हणाले कि, “सांगली जिल्ह्यात सुरू असणाऱ्या लॉकडाऊनचे आदेश 17 मे पर्यंत वाढविण्यात यावेत. या बैठकीत कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम व सर्व लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची खते, बी-बियाणे, कीटकनाशके आदींबाबत गैरसोय निर्माण होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी , तहसीलदार यांनी कृषी निविष्ठा दुकानदारांशी तात्काळ चर्चा करून कोरोना संसर्ग टाळून कृषी निविष्ठांची घरपोच डिलिव्हरी करता येईल का ? याबाबत चर्चा करावी”, अशाही सूचना जयंत पाटील यांनी दिल्या आहेत.

पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी आरोग्य सुविधांसह वैद्यकीय उपकरणांच्या वापराबाबत देखील काही सूचना दिल्या आहेत. याबाबत सूचना देताना जयंत पाटील म्हणाले की, “व्हेंटिलेटर बेड संदर्भात यंत्रणांनी अत्यंत काटेकोर समन्वय ठेवणे आवश्यक असून कोणत्याही गरजवंत रुग्णाला व्हेंटिलेटरवरील उपचारांची गरज असताना गैरसोय निर्माण होऊ नये यासाठी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेड हे डेडिकेटेड ठेवावेत. महात्मा फुले जन आरोग्य योजना ज्या रुग्णालयांना लागू आहे त्यांनी रुग्णांना या योजनेचा लाभ देणे आवश्यक आहे . जी हॉस्पिटल्स या योजनेचा लाभ रुग्णांना देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल . ज्या हॉस्पिटल्समध्ये रुग्ण मृत्यूची संख्या जास्त आहे, हॉस्पिटल्स पेक्षा जास्त रुग्ण ऍडमिट करून घेत आहेत त्यांचे ऑडिट होणे अवश्य आहे. तसेच अन्य ज्या ठिकाणी रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्या ठिकाणी आणखी आरोग्य व्यवस्था उपलब्ध करावी”, असेही निर्देश जयंत पाटील यांनी दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ४,८७८ कोरोना रुग्णांची नोंद, तर २४५ जणांचा मृत्यू

News Desk

“उद्धव ठाकरेंनी निर्लज्ज राजकरण थांबवावं”, पियूष गोयल यांची मुख्यमंत्र्यांवर गंभीर टीका

News Desk

१८ वर्षावरील नागरिकांना मोफत लसीचं गिफ्ट मिळणार? अजित पवार म्हणतात…

News Desk