HW News Marathi
महाराष्ट्र

भ्रष्टाचार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांचा पुण्याहून मुंबईपर्यंत पायी लाँग मार्च

मुंबई | एमपीएसीतील डमी रॅकेट प्रकरण आणि सरकारी नोकरभरतीत होणा-या घोटाळ्याच्या विरोधात पुण्याहून मुंबईच्या दिशेने विद्यार्थ्यांनी पायी मोर्चा काढला. विद्यार्थ्यांचा मोर्चा गुरुवारी सायंकाळी मुलुंड टोलनाक्यावर मुंबई पोलिसांनी रोखला. या मोर्चाला परवानगी नसल्याचे कारण सांगत मुलुंडच्या नवघर पोलिसांनी ४० ते ५० विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन या सर्व विद्यार्थ्यांना पोलिसांनी प्रभादेवीच्या भूपेश गुप्ता भवन येथे रात्रभर नजर कैदेत ठेवले.आज (शुक्रवारी) सकाळी १० वाजता त्या सर्व विद्यार्थ्यांना सोडण्यात आले.

एमपीएससीतील डमी रॅकेट प्रकरण, नांदेड पोलीस भरती, परिवहन निरीक्षक भरती आणि शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा या भ्रष्टाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी हा लाँग मार्च मोर्चा काढण्याचा निर्णय घेला. सरकारी नोकरीत होणारे घोटाळे आणि भ्रष्टाचार थांबविण्यासाठी भ्रष्टाचारविरोधी संघर्ष समितीने हे आंदोलन पुकारले आहे. या सर्व घोटाळ्यांची सीबीआय चौकशी करुन गुन्हेगारांना शिक्षा द्यावी, या सर्व मागण्या घेऊन १९ ते २५ मे असा पुणे ते मुंबई सात दिवसाचा पायी लाँग मार्च विद्यार्थ्यांनी काढला.

१९ मे रोजी पुण्यातील डेक्कनच्या नदीपात्र चौपाटी येथून या लाँग मार्चला सुरुवात झाली होती. हे विद्यार्थी तळेगाव, दाभाडे, लोणावळा, कर्जत, बदलापूर आणि ठाणे या ठिकाणी थांबा घेत मुंबईत दाखल झाले. हा मोर्चा आज आझाद मैदानावर दाखल झाला. विद्यार्थ्यांचे प्रवक्ते त्यांच्या मागण्यांचे निवेदन घेऊन राज्यपालांना भेटण्यासाठी गेले होते. पण राज्यपालांची भेट झाली नसून त्यांचे अप्पर सचिव डिसुझा यांची भेट झाली त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्याबद्दल सकारात्मक भुमिका घेत राज्यपालांपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या पोहचविण्याचे आश्वासन दिल्याचे विद्यार्थ्यांचे प्रवक्ते पंकज चव्हाण यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या या मागण्या राज्यपालचे अप्पर सचिव डिसुझा यांच्यापर्यंत कधी पोहचवतील आणि राज्यपालापर्यंत हे पोहचल्यानंतर मुख्यमंत्र्यांपर्यंत या विद्यार्थ्यांच्या मागण्या कधी पोहचले. राज्यपालांचे अप्पर सचिव, राज्यपाल आणि मुख्यमंत्री हे सर्व चक्रपुर्ण होण्यासाठी किती वेळे लागेल याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘BMC मध्ये मुंबईतील कर्मचाऱ्यांची कमाई लुटण्याचे काम’, भाजप आमदाराचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

Aprna

उर्मिला मातोंडकर विधानसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांचा करणार प्रचार ?

News Desk

मुंबईत पावसाचा कहर चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळली, 14 जणांचा मृत्यू!

News Desk
मुंबई

वातानुकूलित लोकल पास ३ आणि ६ महिन्यांचा काढता येणार

News Desk

मुंबई | वातानुकूलित लोकलने प्रवास करणा-या प्रवाशांसाठी लवकरच ३ आणि ६ महिन्याचे पास देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. वातानुकूलित लोकलसाठी सध्या एक महिन्याचा पास काढण्याची सोय आहे. परंतु गेल्या काही दिवसांत वातानुकूलीत लोकलच्या प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे ३ व ६ महिन्यांचा पास सुरु करण्यात यावा असा प्रस्ताव पश्चिम विभागीय रेल्वेकडून मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

सध्या वातानुकूलित रेल्वेतून चर्चगेट ते विरार या एकेरी प्रवासासाठी २०५ रुपये तिकीटदर आहे. एका महिन्याच्या पाससाठी २,०४० रुपये प्रवाशांना मोजावे लागत आहेत. हि लोकल सेवेत आल्यापासून आतापर्यंत १७ हजारपेक्षा जास्त प्रवाशांनी एका महिन्याचा पास,तर ८२ हजारपेक्षा जास्त प्रवाशांनी तिकीट काढल्याची माहिती मिळाली आहे. पासाला दिलेल्या पसंतीमुळे पश्चिम रेल्वेने ३ आणि ६ महिन्यांचा पासही प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, अशी माहिती देण्यात रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

Related posts

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल ?

News Desk

काळाघोडा फेस्टिव्हला मुंबई हायकोर्टाचा दणका

swarit

मुंबईतील अनेक हॉटेलमधे ग्राहकांची फसवणूक !

News Desk