HW News Marathi
महाराष्ट्र

२४ जानेवारीला होणारा राज्यव्यापी बंद शांततेत पार पाडणार

मुंबई | नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात येत्या २४ जानेवारीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. दरम्यान या बंदमध्ये एकूण ३५ संघटना सहभागी होणार असल्याचीही माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. तसंच जातीनिहाय जनगणनेची मागणीही त्यांनी या वेळी केली आहे.मोदी सरकारने जीएसटी सारखे निर्णय एका झटक्यात केल्यामुळे अधिकारी, व्यापारी कोणालाच याची कल्पना न आल्याने काळ्या पैशावर चालणारे अनेक व्यवसाय-रोजगार एका क्षणात बंद झाले. आणि त्याचा विपरीत परिणाम आर्थिक स्थितीवर झाला.

देश चालवण्यासाठी किमान १४ लाख कोटी लागतात. पण सद्यस्थितीला सरकारकडे फक्त ११ लाख कोटी जमा झाले आहेत. १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. तोपर्यंत ३ लाख कोटींची ही तूट भरून निघेल असे वाटत नाही. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप देशाला आर्थिक दिवाळखोरी कडे नेत आहे, असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी केला. देशाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली असताना विरोधक सरकारला हवं तसा तीव्र विरोध करत नाही. त्यामुळेच २४ जानेवारीला वंचित बहुजन आघाडीने सीएए आणि एनआरसीला विरोध करणाऱ्या संघटनांसह बंद पुकारणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेत सर्व सामाजिक आर्थिक माहिती समोर येते मग एनपीआरची वेगळी गरज काय आहे? असा सवालही उपस्थित केला. “२४ तारखेचा बंद शांतपणे पार पडेल. आम्ही लोकांसमोर सर्व स्थिती मांडली आहे. आता लोकांनी स्वतः ठरवून बंदला पाठिंबा द्यावा असे आम्हाला वाटते. आम्ही बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जबरदस्ती करणार नाही. देशात सध्या सीएए आणि एनआरसीबद्दल जे आंदोलन सुरू आहे. ते विविध विद्यार्थी संघटना आणि एनजीओ यांनी उभारले आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि प्रमुख पक्षांनी स्वतःच्या बळावर आंदोलन करावे. दुसऱ्याच्या आंदोलनाच्या व्यासपीठावर जाऊन फायदे घेऊ नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, पुतळे निर्जीव असून माणूस जिवंत आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या इंदू मिलमधील स्मारकावर पैसे खर्च करण्याऐवजी ते पैसे वाडिया सारख्या रुग्णालयांना द्यावे. माझ्या या वक्तव्यावर जर कोणी टीका करणार असेल तर करावी मी टीकेला घाबरत नाही”, असे आंबेडकर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पेज ३ मंत्र्यांना झटका. ‘बोलाची कढी, बोलाचा भात”, मनसेचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

News Desk

कृषी कायद्यात बदल होणं आवश्यक, दुरुस्ती विधेयक मांडा!

News Desk

बुरा न मानो होली है… संजय राऊत यांचे सूचक ट्विट

News Desk