HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ, मुख्यमंत्र्यांची घोषणा

नागपूर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज (२१ डिसेंबर) राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सभागृहात दिली आहे. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. महात्मा फुले योजनेतून शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देण्यात आली आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात आल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र त्यानंतर शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडणाऱ्या भाजपने सभात्याग केला आहे. ७/१२ कोरा करण्याचा शब्द सरकारकडून पाळण्यात आला नाही, असा आरोप यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतक-यांकडून पाय धुवून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी वाटली नाही? : सचिन सावंत

News Desk

भाजपचे खासदार सायकलवरून संसदेत जायचे, ते तुम्ही विसरालात?, मलिकांनी फडणवीसांना डिवचले

News Desk

शाळांच्या फीमध्ये १५ टक्के कपात!

News Desk