HW News Marathi
Covid-19

चिंताजनक! राज्यात गेल्या २४ तासांत ४३,१८३ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई | राज्यात अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर काही शहरांमध्ये कडक निर्बंध देखील लादण्यात आले आहेत. मात्र, तरीही राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा वेग थांबायचं नाव घेताना दिसत नाही. राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल ४३,१८३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

 

राज्यात ३२,६४१ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २४,३३,३६८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.२% एवढा झाला आहे. राज्यात २४९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९२% एवढा आहे.

सध्या राज्यात १९,०९,४९८ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर १८,४३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,६६,५३३ सक्रीय रुग्ण आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल ८०११ कोरोना रुग्णांची नोंद तर ६५ बाधितांचा मृत्यू झाले आहेत.

मुंबईची स्थिती काय?

दरम्यान, काल (१ एप्रिल) दिवसभरात मुंबईथ ८ हजार ६४६ नवीन कोरोनाबाधित वाढले असून, १८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे.याशिवाय मागील २४ तासांत मुंबईत ५ हजार ३१ रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. आजपर्यंत ३ लाख ५५ हजार ६९१ जण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीस मुंबईत ५५ हजार ५ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत ११ हजार ७०४ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी अयोध्येला जाण्यास कंबर कसलीये, आता काँग्रेसने यापासून दूरच राहावे !

News Desk

मुंबईतील पुढील आठवड्याचं लसीकरण जाहीर, थेट केंद्रावर येणाऱ्यांना देणार लस

News Desk

राज्यात आज पुन्हा ३० हजारांच्या आत आढळले रूग्ण तर बरे डिस्चार्ज रूग्ण संख्या वाढली

News Desk