HW News Marathi
महाराष्ट्र

“ठाकरे सरकारची अजून एक वसूली गँग”

मुंबई | राज्यात सध्या सरकारमधील काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले जात आहेत. आधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्याला १०० कोटीच्या वसूलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. आता आणखी एका मंत्र्यावर भाजपने गंभीर आरोप केले आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गृहनिर्माण खात्यावर पर्यायाने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केलाय. गृहनिर्माण खात्यातही मोठं वसूली रॅकेट सुरु असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.

काय आहे किरीट सोमय्या यांचा आरोप?

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आशीर्वादाने एसआरए, म्हाडा, बीएमसी इथं १०० बिल्डरची यादी, 100 आरटीआय, मंत्री महोदयांचे आदेश घेऊन प्रविण कलमे हे केले काही महिने वसुली गँग चालवत आहेत. त्याबाबत किरीट सोमय्या यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त महासंचालक प्रभात कुमार यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. यावेळी काही पुरावेही दिलायाचा दावा सोमय्या यांच्याकडून करण्यात आला आहे.

१०० रुपये प्रती फूट हा सध्याचा एसआरए, म्हाडाचा बिल्डरांसाठी दर चालत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रति महिना १०० कोटी रुपये वाझे गँगकडून हवे असतात तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे वाझे म्हणजे प्रविण कलमे हे महापालिका, म्हाडा, एसआरए मध्ये १०० बिल्डर्सच्या विरोधात १०० आरटीआय करतात. त्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड त्वरित अहवाल सादर करावा असे आदेश देतात. लगेच एसआरए असो, म्हाडा असो यांचे ‘वसुली गँग’चे अधिकारी कामाला लागतात. प्रविण कलमेला घेऊन हे अधिकारी प्रत्यक्ष साईट व्हिजीट करतात.

ठाकरे सरकारची अजून एक वसूली गँग. याप्रकरणात मंत्रालयात तक्रार केल्यानंतर काही दिवस ही वसुली गँग शांत होती. आता पुन्हा वसुली गँगचे काम जोरात सुरु आहे. कलमे हे ‘अर्थ’, ‘आकांक्षा’ या बोगस एनजीओच्या नावाने पत्र देतात आणि गृहनिर्माण मंत्री त्याच्यावर निर्देश देतात, असा आरोप सोमय्या यांनी केला.

आव्हाडांच्या चौकशीची मागणी

सोमय्या यांनी या प्रकरणात प्रभात कुमार यांच्याकडे तक्रार आणि १०० पानांचे पुरावे दिले आहेत. तसेच, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, प्रविण कलम, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित अधिकारी, म्हाडाचे अधिकारी यांची चौकशी करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या गंभीर आरोपांवर आता जितेंद्र आव्हाड काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याच्या अजित पवारांच्या घोषणेवर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब

News Desk

ED कडून नवाब मलिकांची मालमत्ता जप्त, रहत्या घरावर देखील टाच

Aprna

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी कालवश

News Desk