HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आणि ओबीसी समाजात सरकारला भांडणं लावायची आहेत, विनायक मेटेंचा गंभीर आरोप

बीड | ‘सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न ओबीसी आणि मराठा समाजात चिघळत ठेवायचा आहे. दोन्ही समाजात भांडणे लावायची आहेत’, असा गंभीर आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. तसंच, ‘मराठा उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना बाजूला करा’, अशी मागणीही मेटे यांनी केली आहे. बीडमध्ये पत्रकारांशी बोलत असताना विनायक मेटे यांनी राज्य सरकार आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली आहे.

मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. नोकर भरती, मेघा भरती रखडली आहे. राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाबाबतच्या हलगर्जीपणाच्या धोरणाविरुद्ध ७ नोव्हेंबरला मशाल मार्च काढण्यात येणार आहे. तो बांद्रा येथील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ पर्यंत हा मशाल मार्च काढण्यात येणार आहे, असं विनायक मेटे यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजचा दिवस माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण ! मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची भावनिक प्रतिक्रिया

News Desk

‘संजय राऊतांचं असंय, खातात शिवसेनेचं पण निष्ठा शरद पवारांवर’ – गोपीचंद पडळकर

News Desk

पंकजा मुंडे पुन्हा एकदा मैदानात! देवेंद्र फडणवीसांसोबत मराठवाड्यातील अतिवृष्टी भागाची पाहणी करणार

News Desk