HW News Marathi
महाराष्ट्र

“तुम्ही काय खावे, हेसुद्धा आता शासन ठरवणार”, आव्हाडांची गुजरात सरकारवर टीका

मुंबई। गुजरातमधील अहमदाबादमध्ये महानगरपालिकेकडून रस्त्यांवर मांसाहारी खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांना बंदी घालण्यात आली आहे. अहमदाबाद महानगरपालिकेने दोन दिवसांपूर्वी हा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयावरून राजकारण चांगले तापले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुजरातमधील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

आव्हाडांनी ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करत गुजरात सरकारवर टीका केली आहे. “अहमदाबादमध्ये रस्त्यावर मांसाहारी खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांना मज्जाव करण्यात आला आहे. ८० टक्के मांसाहारी लोक असलेल्या या देशात बीफबंदी हा ट्रेलर होता. पुढे काय घडणार याचा इशारा देणारा चित्रपट गुजरातमध्ये सुरू झाला आहे. तुम्ही काय खावे, हेसुद्धा आता शासन ठरवणार”, असं म्हणालं.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1460900477306957825?s=20

नेमका काय आहे निर्णय

यानुसार शाळा, महाविद्यालये आणि धार्मिक स्थळांपासून १०० मीटर अंतरामध्ये मांसाहारी पदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉलवर गुजरात सरकारने कारवाई करण्यात आली आहे. तसेच, मांसाहार पदार्थ विणा-यांना स्टॉल विक्रेत्यांना मनाई करण्यात आली आहे. यामुळे स्टॉल मालकाणच्या अडचणीत वाढ झाली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मनसेसोबत युतीसाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागेल’, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

News Desk

‘म्हणून नवाब मलिक यांनी वकिली सुरू केली, शाहरुखच्या मुलाचं वकीलपत्र घेतलं!’

News Desk

“भाजपाचं म्हणजे, मी नाही त्यातली आणि…” सामना अग्रलेखातून टोला

News Desk