HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राचा सुपुत्र कौस्तुभ राणे काश्मीरमध्ये शहीद

मुंबई | जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्रातील सुपुत्र शहीद झाला आहे. मेजर कौस्तुभ प्रकाश राणे असे शहीद जवानाचे नाव असून ते ठाणे जिल्ह्यातील मीरारोड येथील रहिवासी होते. राणे हे भारतीय लष्कराच्या ३६ रायफल बटालियनमध्ये मेजर म्हणून कार्यरत होते. काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यासोबत झालेल्या चकमकीत शहीद झाले. मेजर कौस्तुभ राणेच्या जाण्याने मुंबईसह महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.मेजर कौस्तुभ यांचे पार्थिव आज (बुधवारी) सकाळी ११ वाजताच्या सुमारास श्रीनगरहून दिल्लीला विमानाने येथून मुंबईकडे येणार आहे. दुपारनंतर कौस्तुभ यांच्या निवासस्थानी पोहचणार आहे.

कौस्तुभ राणेचा अल्प परिचय

मेजर कौस्तुभ राणे (२९) हे ठाणे जिल्ह्यातील मीरारोडचे रहिवासी होते. त्यांचे मूळगाव कोकणातील वैभववाडी आहे. कौस्तुभचे शालेय शिक्षण हॉली क्रॉस शाळेतून झाले असून त्यांचे वडील प्रकाश टाटा कंपनीत तर आई ज्योती या बोरिवली येथील गोखले शैक्षणिक संस्थेत काम करत होते. कौस्तुभच्या पश्चात आई-वडील, बहीण, पत्नी आणि अडी वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी  राज्यात दोन समित्या मुंबईसाठी स्वतंत्र समिती स्थापन करणार, राजेश टोपे

News Desk

“घाव वर्मी बसला”, सामना अग्रलेखावरुन फडणवीसांचा पलटवार  

News Desk

“तर.. शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांना विचारायला हवं”, सुधीर मुनगंटीवाराचं परिवहन मंत्र्यांना उत्तर

News Desk
राजकारण

माझी मुलगी पूर्णपणे निर्दोष, रॅगिंगचा विचारही करू शकत नाही !

News Desk

मुंबई | डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी शुक्रवारी (३१ मे) मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, यावेळी न्यायालयात क्राईम ब्रँचकडून या तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, मुंबई सत्र न्यायालयाकडून डॉ. पायल आत्महत्या प्रकरणातील डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल या तिन्ही महिला आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी समाजातील डॉ. पायल तडवी यांनी आपल्या वरिष्ठांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून बुधवारी (२२ मे) आत्महत्या केली. दरम्यान, या पार्श्वभूमीवर तीन आरोपींपैकी एक डॉ. भक्ती मेहेर यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जात कोणाला माहित असते ? मुलांना एकमेकांची जात कुठे माहित असते ?

“आमच्या मुली या प्रकरणात दोषी नाहीतच. त्यांना दिवसभर कामच एवढे असते कि त्यांना हे सगळे प्रकार करायला वेळच मिळू शकत नाही. आमची मुलं पण याच परिस्थितीतून गेली. पण त्यांनी असं केलं का ? आमच्या मुलींवर जे आरोप लागले आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत. जात कोणाला माहित असते ? मुलांना एकमेकांची जात कुठे माहित असते ? ज्या दिवशी आत्महत्या झाली त्या दिवशी सकाळी डॉ. पायल तडवी यांनी डॉ. भक्ती मेहेर यांना असिस्ट करत २ ऑपरेशन्स केली होती. जे निर्दोष आहेत त्यांना न्याय मिळालाच मिळालाच पाहिजे. तपास झालाच पाहिजे”, अशी प्रतिक्रिया या प्रकरणातील आरोपी डॉ. भक्ती मेहेर यांच्या आईने दिली आहे.

माझी मुलगी पूर्णपणे निर्दोष, रॅगिंगचा विचारही करू शकत नाही !

“क्राईम ब्रॅंचपेक्षाही या प्रकरणाचा तपास अगदी सीबीआयकडे सोपविला तरी आमची काही हरकत नाही. आम्हाला चिंता नाही. परंतु, समाजासमोर सत्य आणा. माझी मुलगी ही यात पूर्णपणे निर्दोष आहे. ती कधीही कोणाला असं बोलू शकत नाही. रॅगिंगचा तर ती विचारही करू शकत नाही. तुम्ही आमची संपूर्ण कौटुंबिक पार्श्वभूमी तपासू शकता. मात्र, अशा पद्धतीच्या खोट्या बातम्या पसरवू नका. रॅगिंग होऊच शकत नाही. ते दररोज २००-२०० रुग्णांवर उपचार करतात. कामाचा ताण जास्त असतो. त्यात त्यांचे वरिष्ठ त्यांना ओरडतात. ते त्यांच्या कनिष्ठांना ओरडतात. हे शक्य आहे. मात्र, रॅगिंग होऊच शकत नाही. ज्या दिवशी आत्महत्या झाली त्या दिवशी सकाळी डॉ. पायल तडवी यांनी डॉ. भक्ती मेहेर यांना असिस्ट करत २ ऑपरेशन्स केली होती. क्राईम ब्रँच निश्चितच सत्य शोधून काढेल. या तिन्ही मुलींवर हा फार मोठा आघात आहे”, अशी प्रतिक्रिया या प्रकरणातील आरोपी डॉ. भक्ती मेहेर यांच्या वडिलांनी एच.डब्ल्यू.सोबत बोलताना दिली आहे.

Related posts

गोव्यात राहुल गांधींनी घेतली पर्रीकरांची भेट, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

News Desk

पैठणच्या सभेवरुन वरुण सरदेसाई यांचा मुख्यमंत्र्यांना टोला, म्हणाले…

Darrell Miranda

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी नवाब मलिक यांची नियुक्ती

News Desk