HW News Marathi
महाराष्ट्र

२७ जानेवारीपासून मुंबईत ‘नाइट लाइफ’, निर्णयाला मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई | २७ जानेवारीपासून मुंबईत ‘नाईट लाईफ सुरू होणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. नाईट लाईफमुळे मुंबई पोलिसांवर ताण येणार नाही, असेही आदित्य ठाकरेंनी आज (२२ जानेवारी) पत्रकार परिषदेत म्हणाले. तसेच पब आणि बारसाठी नवे नियम नाह तर पूर्वीचे नियम असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबईतील पर्यावरणाला वाढ देण्यासाठी नाईट लाईफची गरज असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.

‘नाइट लाइफचा प्रयोगचा भाजपने महाविकासआघाडीवर जोरदार टीका केली. यावर भाजपचे नेते राज पुरोहित म्हणाले की, “मुंबईत नाईटलाइफ सुरु केल्यास हजारो निर्भयासारखी प्रकरणे घडतील, ” असा दावा त्यांनी केला होता. यावर आदित्या ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून विरोधकांवर हल्ला चढविला. ‘महाविकास आघाडी जनतेच्या हितासाठी काम करतेय. लोकांच्या भल्याचे अनेक निर्णय घेतले जात आहेत. ‘नाइट लाइफ’चा प्रयोग रोजगार निर्मितीसाठी करत आहोत. आमचे मन स्वच्छ आहे. शुद्ध हेतूनेच आम्ही हा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर टीका करणाऱ्यांची मने प्रदूषित आहेत,’ असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सिंधुदूर्गात विजय मिळणारे राणे म्हणतात नांदेड म्हणजे महाराष्ट्र नव्हे

News Desk

मला शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करायाचे !

swarit

पूर परिस्थिती असताना, तुम्ही निवडणुकांचा विचार तरी कसा करून शकता !

News Desk