HW News Marathi
Covid-19

दिलासादायक ! महाराष्ट्राचा कोरोना रिकव्हरी रेट वाढला

मुंबई । राज्यात कोरोनाबाधितांचा दररोज वाढणारा आकडा काहीसा नियंत्रणात आल्याचे चित्र आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (६ ऑक्टोबर) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत १२ हजार २५८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर अत्यंत दिलासादायक बाब म्हणजे याच एका दिवसात तब्बल १७ हजार १४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात गेल्या अनेक दिवसांत कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा निश्चितच दिलासादायक आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ११ लाख ७९ हजार ७२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण २ लाख ४७ हजार २३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता वाढले असून ८०.४८ % इतके झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक! राज्यात आज एकही ओमायक्रॉन रुग्णाची नोंद नाही

News Desk

संभाजीराजे छत्रपतींच्या मागणीनंतर ‘त्या’ ट्विटसाठी फडणवीसांनी मागितली माफी

News Desk

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागातील दौऱ्यानंतर फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, केल्या ‘या’ मागण्या

News Desk