HW News Marathi
महाराष्ट्र

“महाविकास आघाडी सरकार पोलीस आणि गुंडांच्या जोरावर” चंद्रकांत पाटलांची जहरी टीका!

सांगली। नारायण राणे यांची अटक आणि सुटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण अर्थातच राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर टीका केली आहे. हे सरकार पोलीस आणि गुंडांच्या जोरावर चाललंय, असा आरोप पाटील यांनी सांगलीत बोलताना केलाय. तसंच परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात याचिका दाखल करण्याचं काम सुरु आहे. कायद्याच्या दृष्टीनं केसेस दाखल होत आहे. नाशिक युनिटने चार केसेस दाखल केल्या आहेत. आपल्याला वकिलांची तगडी फौज निर्माण करायची असल्याचंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

आम्ही तुटू फुटू असं त्यांना वाटतंय

महाविकास आघाडीतील तीन पक्ष आता शेवटची तडफड करत आहेत. राणेंच्या विषयात उद्धव ठाकरे यांचं वाक्य वाहून गेलं. आपण उद्धव ठाकरे हे काय बोलले होते हे सांगायला कमी पडलो. आम्ही तुटू फुटू असं त्यांना वाटतंय. पण आम्ही सुद्धा संयमाने एक एक बॉम्ब टाकतो आणि गायब होतो, असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिलाय. सत्ता गेल्यानंतर मनस्थिती टिकवणं अवघड आहे. पण इथून कुणीही जाणार नाही, असा विश्वासही पाटीलि यांनी यावेळी व्यक्त केलाय.

पंढरपूर प्रमाणे देगलुरची पोटनिवडणूकही भाजप जिंकणार

आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय भाजप एकही निवडणूक होऊ देणार नाही. नेहमी एकमेकांविरोधात भांडायचं आणि फुटायची वेळ आली की एकमेकांना घट्ट पकडून ठेवायचं. लोकांना उल्लू बनवण्याचं काम सुरु आहे. लोक निवडणुकीची वाट पाहत आहे. पंढरपूर प्रमाणे देगलुरची पोटनिवडणूकही भाजप जिंकणार असा विश्वासही पाटील यावेळी व्यक्त केलाय.

इतके दिवस मंत्री कसा राहिलो?

जर मी क्रिमिनल होतो तर मुख्यमंत्री कसं केलं? इतके दिवस मंत्री कसा राहिलो? असा सवालही राणेंनी विरोधकांना केलाय. आता मोदींच्या काळात केंद्रीय मंत्री झालो. पण पहिली पदं यांनीच दिली ना. तेव्हा नव्हतं का कुणी विरोध करायला? असंही राणे म्हणालेत. साहेबांना जेव्हा दहशतवाद्यांकडून धोका होता, तेव्हा त्यांना मातोश्री सोडायला सांगितलं तेव्हा साहेबांनी सुपुत्राला सोबत घेतलं नाही, असा टोला राणेंनी लगावलाय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सनातन संस्थेवर बंदी घाला | अबू आझमी

swarit

जामीनासाठी नवाब मलिकांच्या मुलाकडे मागितली 3 कोटीची लाच

Aprna

महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरुन अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल!

News Desk