HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आंदोलक आक्रमक,नदी पात्रात उडी घेऊन एकाची आत्महत्या

औरंगाबाद | गेल्या सहा दिवसांपासून मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाने ५८ मुक मोर्चे काढून ही सरकारने आरक्षणाबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

मराठा आरक्षणासाठी औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या मराठा आंदोलनाचे तीव्र पडसाद संपुर्ण महाराष्ट्रात पडताना दिसत आहेत. तर या पार्श्वभूमीवर एका कार्यकर्त्याने औरंगाबाद-नगर रोडवरील कायगाव येथे गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

या कार्यकर्त्यांचे नाव काकासाहेब शिंदे असून ते नागड गावातील रहिवासी आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबादमध्ये आज दुपारी ३.३० च्या सुमारास औरंगाबाद-नगर रोडवरील कायगाव येथे गोदावरी पात्रावरील पुलावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत होते. मराठा समाजाने आंदोलनाकडे सराकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी पुलावरून नदीपात्रात उडी मारली. त्यापैकी काही मच्छीमारांनी या कार्यकर्त्यांना बाहेर काढले.

नदी पात्रात उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना गंगापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु उपचारा दरम्यान काकासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या घटने दरम्यान आंदोलकांनी रास्तारोको केला असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मराठा समाजाने सरकारला वेठीस धरण्यासाठी आषाढी एकादशी निमित्त होणा-या शासकीय महापुजेला मुख्यमंत्र्यांना जाऊन न देण्याचा इशारा, मराठा आंदोलनकांनी दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महापुजेला न जाण्याचा निर्णय घेतला.

आत्महत्येपुर्वी निवेदनातून सरकारला दिला होता इशारा

गंगापूर तालुक्यातील सकल मराठा समाजातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले होते. यात त्यांनी सोमवारी कायगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावरून उडी मारून सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कष्टकरी ऊसतोड कामगरांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न!– अजित पवार

Aprna

सुरक्षेच्या कारणास्तव अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द होणार ?

News Desk

कंगना राणावतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय सुरक्षा

News Desk