HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी देत जयंत पाटील आणि धनंजय मुंडेंचा अडवला ताफा

मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं मात्र कोरोना आणि डेल्टा प्लस व्हेरियंटचा प्रादुर्भाव पाहता ही यात्रा(२९जून) पासून अर्थात मंगळवारपासून स्थगित करण्यात आली आहे. हिंगोलीमध्ये या यात्रेला स्थगित करण्यात आले. परिवार संवाद यात्रेसाठी जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा मराठा आंदोलकांनी ताफा आडवला होता. यावेळी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांचा संताप पाहून जयंत पाटील यांनी गाडीतून उतरून आंदोलनकर्त्यांची समजूत काढली

आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजी ब्रिगेड आणि मराठा आंदोलकानी राष्ट्रवादी नेते जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि रुपाली चाकणकर यांचा ताफा अडवला होता. एक मराठा लाख मराठा घोषणा देत आंदोलकांनी या नेत्यांच्या गाड्यांना घेराव घातला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवास संवाद रॅलीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि रुपाली चाकणकर हिंगोलीच्या दिशेने जात होत्या. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे असी मागणी या आंदोलकांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात परिवास संवाद यात्रा सुरु केली आहे. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि डेल्टा प्लस व्हेरियंटच्या परिणामामुळे ही यात्रा मंगळवारपासून स्थगित करण्यात आली आहे. हिंगोलीमध्ये या यात्रेला स्थगित करण्यात आले. परिवार संवाद यात्रेसाठी जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा मराठा आंदोलकांनी ताफा आडवला होता. यावेळी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांचा संताप पाहून जयंत पाटील यांनी गाडीतून उतरून आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजी ब्रिगेड आणि मराठा आंदोलकानी राष्ट्रवादी नेते जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि रुपाली चाकणकर यांचा ताफा अडवला होता. एक मराठा लाख मराठा घोषणा देत आंदोलकांनी या नेत्यांच्या गाड्यांना घेराव घातला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद रॅलीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि रुपाली चाकणकर हिंगोलीच्या दिशेने जात होत्या. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे असी मागणी या आंदोलकांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…म्हणून ‘पावर’काका मुख्यमंत्री होते”, गोपीचंद पडळकरांचे जितेंद्र आव्हाडांवर टीका

Aprna

विरोधी पक्ष सोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं, राऊतांचा टोला

News Desk

महाराष्ट्राला लागलेली भाजपा -सेनेची कीड ठेचून काढा – धनंजय मुंडे

swarit