HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मराठा नेते गैरहजर, ४८ पैकी केवळ ८ जणांची उपस्थिती

मुंबई | राज्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरणे देखील मुश्कील झाले आहे. त्यामुळे सरकार आणि मराठा समाजामधील तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे मराठा समाजातील मान्यवरांची बैठक बोलवली होती.

परंतु मुंबईत लाखोंच्या संख्येंने काढलेल्या मुक मोर्चाचे नेतृत्व छत्रपती संभाजी राजे यांनी केले होते. तरीही मुख्यमंत्री फडणवीसांनी विविध प्रकारे आश्वासन देऊन देखील मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. जर संभाजी राजे मराठ्यांच्या समोर तोंडघशी पडू शकतात तर आपली देखील अशीच स्थिती होईल हा विचार करुन आज अनेक मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे पाठ फिरवली.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांवर मराठा समाजातील मान्यवरांना देखील विश्वास नाही हे यातून स्पष्ट होत आहे. या बैठकीला येणा-या लोकांच्या यादीमध्ये विविध क्षेत्रातील विचारवंत लेखक यांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, उद्धव ठाकरेंची ठाम भूमिका

News Desk

पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करणार विधेयक मंजूर

News Desk

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राम शिंदेंनी घेतली उदयनराजेंची भेट

News Desk