HW News Marathi
महाराष्ट्र

गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर मराठ्यांचे ठिय्या आंदोलन

पुणे | मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आज (गुरुवारी) सकाळपासून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनाची बापट यांना कल्पना असल्यामुळे यांनी त्यांच्या कसबा गणपतीजवळील कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

यानंतर बापट यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. आणि त्यांच्याशी बातचीत देखील केली. तसेच भाजप सरकार हे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबात सकारात्मक असल्याचे बापट यांनी आंदोलकांना सांगितले. यानंतर राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण आणि राज्य मंत्री दिलीप कांबळे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

चाकण हिंसाचार प्रकरणी पोलिसांची धरपकड

चाकण हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली असून पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात २० जणांना ताब्यात घेतले आहे. मराठा आरक्षणासाठी चाकणमध्ये बंद पुकारला होता. या बंदा दरम्यान चाकणमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. चाकण हिंसाचारात मराठा आंदोलकांनी एसटी बसेसची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती. अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले देखील झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अहमदनगर शहरातील राजकीय गुंडगिरी रोखणार कोण ?

News Desk

भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर :खा. अशोक चव्हाण

swarit

भाजपशिवाय सरकार स्थापन होऊच शकत नाही !

News Desk
देश / विदेश

साडेतीनशे कोटी रुपयांचा फाइन वसूल

News Desk

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियांने ग्राहकांच्या खिशातून सुमारे साडेतीनशे कोटी रुपये वसूल केले आहेत. हे पैसे केवळ देवाण-घेवाणपोटी वसूल करण्यात आलेल्या दंडातून मिळाले, हे विशेष. तुमच्या खात्यात तीन हजारांपेक्षा कमी रक्कम असेल तर तुम्हाला दंड द्यावा लागतो. तसेच इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास पैसे आकारले जातात. मेट्रो शहरात दीडशे रुपयापर्यंत दंड आकारला जातो. तुम्ही पैसे काढा किंवा काढू नका, तुम्हाला भूर्दंड भरावाच लागणार हे नवे बँकींक धोरण असल्याचे सध्या चित्र आहे. एकीकके शासन बँक व्यवहार करण्यास प्रोत्सहन देत असून दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा धंदी सुरू आहे. एकट्या एसबीआय बँकेने ग्राहकांकडून दंडापोटी साडेतीनशे कोटी वसूल केले आहेत. इतर खासगी बँकांची ही रक्कमो कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

Related posts

लोकशाहीसमोर आज हुकूमशाही अखेर झुकली ! – जयंत पाटील

News Desk

भारताची शांततेच्या मुद्यांवरून पहिल्यांदा तालिबानसोबत चर्चा

News Desk

रियायन्स जिओमध्ये आणखी एका अमेरिकी कंपनीची गुंतवणूक

News Desk