HW News Marathi
महाराष्ट्र

महाभकास आघाडी सरकारमुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती

मुंबई | सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज (९ सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मराठा आरक्षण प्रकरण आता घटनापीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्यात आली आहे. त्यानंतर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला असून महाभकास आघाडी सरकारमुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली देत नोकरी आणि शिक्षणासाठी तूर्त मराठा आरक्षण लागू होणार नाही, असे स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी मराठा आरक्षणाकडे लक्ष दिलं नाही. महाविकास आघाडीला आरक्षण नको होतं. म्हणूनच आरक्षणाकडे लक्ष दिलं नाही.

“आता या प्रकरणाचा निकाल खंडपीठाकडे आहे. त्यामुळे काहीही केलं आंदोलन केलं तरी काहीही करता येणार नाही. हे आरक्षण कधीपर्यंत नाही हे आता सांगता येणार नाही. आम्ही कायम तयारी करा असं सांगायचो. पण प्रत्येक वेळी केवळ ट्विट करून सांगितलं जायचं. शासनानं अर्ज केला नाही. महाभकास आघाडीला हे आरक्षण नकोच होतं. आरक्षण स्थगित झालं नाही मिळालं तरी चालेल अशी मानसिकता त्यांची होती,” असा आरोपही त्यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘एखादा पेंग्विन कमी पाळा, पण खड्डे बुजवा’-नितेश राणेंचे महापौरांना पत्र

swarit

“राजकारण आपलं होतं मात्र जीव जनतेचा जातो”

News Desk

“ठाकरे सरकारची अजून एक वसूली गँग”

News Desk