HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूरतून २ लाख तर सांगलीतून ४ लाख नागरिकांचे स्थलांतर

पुणे | कोल्हापूर आणि सांगलीतील महापूरात आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. आज अखेर (११ ऑगस्ट) सांगलीतून ४ लाख ४१ हजार ८४५ नागरिकांचे स्थलांतरीत करण्यात आले तर कोल्हापूरातील २४९ गावांमधून ५० हजार ५९४ कुटुंबातील २ लाख ४५ हजार २२९ नागरिकांचे स्थलांतर झाल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.

कोल्हापूरात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र अध्याप पाणी पातळीत घट होताना दिसत नाही. लक्ष्मीपुरी, बापट कॅम्प, जाधववाडी, कदम वाडी, महावीर कॉलेज परिसर, न्यू पॅलेस परिसर, कसबा बावडा आदी नागरी भागात शिरलेले पाणी कायम आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात घुसलेले पाणी कमी झाले.

ब्रह्मणाळमध्ये आज ५ जणांचे मृत्यू सापडले आहे. तर सांगलीत आतापर्यंत १९ जण आणि कोल्हापूरात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन्ही जिल्ह्यातून प्रत्येकी १-१ जण बेपत्ता असल्याची माहिती विभागयुक्ती दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. सांगली-कोल्हापूर मिळून ३,७८,००० लोकांना सुरक्षिस्थळी हलविण्यात आले आहे. ३०६ छावण्यांमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.

तसेच सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून १६६५७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर कोयना धरणातून ५३८८२ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातून ५ लाख ३० हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. आयर्विन पुल सांगली येथे ५४ फूट ५ इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी ४५ फूट) तर अंकली पुल हरिपूर येथे ५९ फूट ३ इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी ५० फूट ३ इंच).

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१९ वर्षीय तरुणीवर नालासोपारामध्ये सामूहिक बलात्कार, एक जण पोलिसांच्या ताब्यात

Aprna

भाजप-शिवसेनामधील संघर्ष सोडविण्यासाठी अमित शाह मुंबई दौऱ्यावर

News Desk

“नांदेडमध्ये झालेला प्रकार हा धक्कादायक आणि दुर्दैवी, दोषींवर कारवाई होणार” – अशोक चव्हाण  

News Desk