HW News Marathi
महाराष्ट्र

AIMIM चे खासदार इम्तियाज जलील ताफ्यासह चांदिवलीच्या सभेसाठी मुंबईत दाखल

मुंबई | एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वाखाली आज (११ डिसेंबर) औरंगाबाद ते मुंबई तिरंगा यात्रा काढली. जलील यांनी १२ तासाच्या प्रवासानंतर चांदिवलीमध्ये सभेसाठी दाखल झाले आहेत. या सभेसाठी एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी सभेसाठी दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांकडून जलील यांना रोखण्याचा प्रयत्न करूनही ते त्यांच्या कार्यकर्त्यांसह मुंबईतील चांदिवलीत सभेसाठी दाखल झाले आहेत. या जलील आणि ओवैसी यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

मुंबईत काल (१० डिसेंबर) ओमायक्रॉनचे ३ रुग्ण सापडले. यामुळे मुंबईमध्ये ११ आणि १२ डिसेंबरला कलम १४४ लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जलील यांना रोखण्यासाठी मुंबईच्या हद्दीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. जलील यांच्या ताफा वाशी मानखुर्द मार्गे चांदिवलीत दाखल झाल्याची माहिती प्रसार माध्यमांमधून झाले आहे.

जलील यांच्या सभेला परवानगीबाबात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्रकारांनी विचराल्यावर ते म्हणाले, “ओमायक्रॉनच्या वाढात धोका पाहाता. मुंबईत पोलीस आयुक्तांनी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे मुंबई कोणतीही सभा आणि मोर्चा करण्यास बंदी आहे.”या रॅलीच्या माध्यमातून जलील यांनी मुस्लीम आरक्षण, वक्फ बोर्डाची ९३ हजार एकर जमिनी लाटल्या ?, आणि महाराष्ट्रात मुस्लीम तिरंगा हातात घेऊ शकत नाही का ?, असा सवाल सरकारला केला. जलील सभेत दाखल झाले तेव्हा एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी दिल्या.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुडाळ नगरपंचायतीच्या तोंडावर राष्ट्रवादीला भाजपचा धक्का,नेते-पदाधिकाऱ्यांनी हाती घेतला भाजपचा झेंडा

News Desk

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात योग्य कारवाई न केल्याचा समीन वानखेडेंवर ठपका, केंद्रीय गृहमंत्रालायने दिले चौकशीचे आदेश

Aprna

राज्यपाल अभिभाषण न करता विधानसभेतून निघून गेले; ‘मविआ’ नेत्यांचे आंदोलन

Aprna