HW News Marathi
महाराष्ट्र

राहुल गांधींच्या सभेला कलम १४४ लावणार का? ओवेसींचा सरकारला सवाल

मुंबई। राहुल गांधी यांची सभा होणार असेल, तेव्हा कलम १४४ लावणार का? असा सवाल एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी राज्य सरकारला केली आहे. ओवेसींनी ठाकरे सरकारवर टीका केली, तर मुस्लिम मुलांचे शिक्षण, मुस्लिम आरक्षण या मुद्द्यांवर ओवेसींनी मुंबईतील चांदिवलीमध्ये पार पडलेल्या सभेत ते बोलत होते.
बीएमसी निवडणुकीच्या वेळी देखील आम्हाला रोखणार का?, जलील मुंबई येणार म्हणून ओमायक्रॉनचे कारण देत मुंबई कलम १४४ लावले. मुंबईत दाखल होताना जलील यांना मानखुर्दमध्ये, औरंगाबाद, खारघर आणि वाशी याठिकाणी पोलिसांनी अडवणूक केली. आता राहुल गांधी मुंबईत सभा होणार असेल, तेव्हा कलम १४४ लावणार का? तेव्हा काय करणार असा सवाल ओवेसींनी राज्य सरकारला विचारला आहे.

राजकीय सेक्युलॅरिसम मानत नाही

“महाराष्ट्रात ज्यांच्याकडे जमिन नाही, त्यांना आरक्षण दिले जात नाही. पण ज्याकडे जमिनी आहेत त्यांना आरक्षण दिले जाते, असे म्हणाले. मी राजकीय सेक्युलॅरिसम मानत नाही. तर मी संविधानामध्ये जे सेक्युलॅरिसमला मानतो. न्यायालयाने सांगितले मुस्लिमांना आरक्षण द्यावे. परंतु महाराष्ट्रातील सरकार हे थ्री इन वन सरकार आहे. हे सरकार विसरले असून आता ते मराठा आरक्षणाच्या गप्पा करत आहेत.”
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूरच्या पायी वारीचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयात!

News Desk

‘रोहित पवार हे शरद पवारांचं सुधारित व्हर्जन; तेही पुढच्या ५ पिढ्या घालवतील मातीत’

News Desk

केंद्रिय गृहमंत्री अमित शाह एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर

News Desk