HW News Marathi
महाराष्ट्र

साहित्य संमेलन ही नाशिकचा लौकिक उंचावण्याची संधी! – छगन भुजबळ

नाशिक । “साहित्य संमेलनाचं आयोजन ही नाशिकचं नाव उंचावण्यासाठी लाभलेली महत्वाची संधी असून हे केवळ साहित्य संमेलन नाही तर शहर व जिल्ह्यासाठी हा महत्वाचा उत्सव आहे. सारस्वतांच्या हा मेळावा अधिक दर्जेदार व्हावा त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन व आयोजकांनी नियोजन करावं”, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री आणि साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. ते नॉलेज सिटी येथे ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनाबात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नाशिक शहर व परिसर सुशोभीकरणावर अधिक भर देण्यात यावा. आपल्या दर्जेदार व्यवस्थेतून येणाऱ्या साहित्यप्रेमिंना ज्या सुविधा मिळतील त्यातून नाशिकचं नाव देशपातळीवर पोहचणार आहे. नागरिकांना येण्या-जाण्यासाठी शटल बस सेवा उपलब्ध करून देण्यात यावी. साहित्य संमेलनाचा उत्सव दर्जेदार होण्यासाठी नागरिकांचे सहकार्य तितकंच महत्वाचं असणार आहे. स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक आदरतिथ्य करणारं नाशिक याद्वारे अवघ्या साहित्य विश्वासमोर जाणार आहे.”
भुजबळ पुढे म्हणाले की, आयोजनासंदर्भात लोकप्रतिनिधींसमवेत देखील आढावा बैठक आयोजित करण्यात येणार आहे. हे संमेलन ही प्रत्येकाचा जबाबदारी समजून कुठलीही कमतरता राहणार नाही यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आपण करू. पर्यटन विभागाचं केंद्र या संमेलन स्थळी उभारण्यात येऊन नाशिक जिल्ह्यातील पर्यटनाची माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन पोलीस प्रशासनासह सर्व यंत्रणांनी आपापल्यापरिने यांत योगदान देवून अनेक वर्षे स्मरणात राहील असं दर्जेदार साहित्य संमेलन व्हावं’, अशी अपेक्षाही भुजबळांनी यावेळी व्यक्त केली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जरंडेश्वर तर हिमनगाचे टोक, अमित शाहांना पत्र लिहितोय, सगळी नावं समोर येतील!

News Desk

काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करीत होते, पण अनेक राज्येच भाजपमुक्त झाली !

News Desk

रेमडेसिवीरच्या साठ्यावरुन फार्मा अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि फडणवीस भडकले !

News Desk