HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेचे संताप मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन..

मुंबईः एल्फिस्टन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगरीचेंगरीनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी चर्चगेट रेल्वे मुख्यालयावर संताप मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, प्रवाशी सहभागी झाले होते. सकाळी अकरा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मनसे कार्यकर्त्यांनी विविध रंगाचे पोशाख परिधान केले होते. त्यावर अपघाताला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे, तरी मोठ्या संख्येने मोर्चेकरी चर्चगेटच्या दिशेने रवाना झाले होते. दरम्यान राज ठाकरे स्वतः मोर्चात सहभागी झाले असून त्यांनी चर्चगेट मुख्यालयात धाव घेतली आहे. तेथे त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना प्रवाशांच्या सुरक्षेबाबात प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, मोर्चामुळे वाहतूक व्यवस्थेत किरकोळ बदल करण्यात आले होते. सध्या चर्चगेट स्थानकात मोठी गर्दी झालेली आहे. यामुळे प्रवाशी ताटकळलेले दिसून आले.

राज ठाकरेंनी रेल्वेच्या सुरक्षेसह रेल्वे विभागाच्या परीक्षा मराठी भाषेत घेण्यासाठी अनेकदा आंदोलने केली आहे. काही ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी परीक्षा उधळून लावल्या आहेत. मराठी माणसांसाठी त्यांचे सतत आंदोलन सुरू असते. परंतु रेल्वे हा विषय त्यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिला आहे. आजही ते रेल्वे विषयावर आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“आम्हाला तिघांना ग्रहण लागलं होतं, मात्र पवारांनी विश्वास ठेवला” – धनंजय मुंडे

News Desk

‘बेळगाव महापालिकेत भाजपचा झेंडा फडकला!’

News Desk

‘पुण्याला शिथीलता द्या’ ! महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk
मुंबई

मुंबईकर कामात आगे, पगारात मागे

News Desk

मुंबई | देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या राजधानीत देशातील प्रत्येक तरुण-तरुणी आपली स्वप्न पुर्ण करण्यासाठी मुंबईत येतात. स्वप्न नगरीत आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती पडेल ती कामे करुन आपला उदरनिवार्ह करतात. मुंबईकर काम करण्यात प्रथम क्रमांकावर आहेत. परंतु कमाईच्या बाबतीत मात्र सर्वात मागे असल्याचे नुकतेच एका सर्व्हेक्षणातून समोर आले आहे.

स्वीस बँक यूबीएसने जगभरातील ७७ शहराचा सर्व्ह करण्यात आला असून या सर्व्हे मध्ये ही धकादायक माहिती समोर आली आहे. जगभरातील ७७ शहरात मुंबईकर प्रचंड कष्टाळू आणि सर्वात जास्त काम करत असल्याचे या सर्व्हेतून समोर आले आहे. मुंबईकर वर्षाला सुमारे ३,३१४.७ तास काम करतात. जगभरातील लोक सरासरी १,९८७ तास काम करतात. कमाईच्या बाबतीत मुंबईकर जगात ७६ व्या स्थानावर आहेत. तर कमाईमध्ये जिनेवा, ज्यूरिख आणि लग्जमबर्ग अव्वल स्थानावर आहेत.

Related posts

मुंबईच्या पावसाने घेतला पाच जणांचा बळी

News Desk

ठाकरे कुटुंबियांविरोधातील बेहिशेबी संपत्तीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

Aprna

चार कोटीसह व्हॅन घेऊन चालक फरार

News Desk