HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेकडून अमोल मिटकरींना श्वान आणि बिस्किट भेट!

नाशिक | मनसे आणि राष्ट्रवादीचा वाद आता शिगेला पेटला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे मनसे कार्यकर्ते संतापले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींना श्वान आणि बिस्किट दिलं असून आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

राज ठाकरे यांच्यावर बोलण्याएवढी मिटकरी यांची लायकी नाही.”

मनसे आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमधले वाद आता टोकाला गेले आहेत. मनसेचे पुणे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विभाग प्रमुख जगदीश खांडेकर यांनी मिटकरी यांना थेट गाडी फोडण्याची धमकी दिली आहे. मंत्रालयात जाताना गाडीच्या काचा काळ्या करा, अन्यथा गाडीत दिसल्यास मिटकरींना फोडू, अशी खुली धमकी खांडेकर यांनी दिलीय. त्यामुळे आता हा वाद पेटणार असं दिसतंय. जगदीश खांडेकर म्हणाले, “महाराष्ट्रात आमदार अमोल मिटकरी हा एक बाजारू विचारवंत आलाय. मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय असा द्वेष निर्माण करुन राष्ट्रद्रोह केल्याचा आरोप केलाय, पण त्यांनी राष्ट्रद्रोह म्हणजे काय हे आधी समजून घ्यावं. एखादा व्यक्ती राष्ट्रद्रोही आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार भारतीय संविधानाने ठरवून दिलेल्या कायद्याचं काम आहे. मग मिटकरी भारतीय संविधानापेक्षा मोठा झालाय का? राज ठाकरे यांच्यावर बोलण्याएवढी मिटकरी यांची लायकी नाही.”

“राष्ट्रद्रोह” केला ती व्यक्ती

अमोल मिटकरी म्हणाले होते कि, ” ‘राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करून “राष्ट्रद्रोह” केला ती व्यक्ती! अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे”, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

अजूनही आपण जातीपातीमध्ये खितपत पडलो आहोत. स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही निवडणुकीत भाषणं होतात तेव्हा सगळ्यांकडून सारखं रस्ते, पाणी, विज अशी तिच तिच आश्वासनं दिली जात आहेत. तेव्हा एवढ्या वर्षात आपण काय केलं हे शोधलं पाहिजे. साधारणपणे आपण 99 साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण 99 नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टोमणे पुरे झाले, आता कामाला लागा; केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

Aprna

पक्षातून बाहेर पडलो अन् माझ्या नावाचा जपच सुरु झाला !

News Desk

ईडीचा सर्वात मोाठा घोटाळा बाहेर काढणार; संजय राऊतांचा इशारा

Manasi Devkar