HW News Marathi
महाराष्ट्र

आम्ही वाघाच्या काळजाचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे शिलेदार ,मुख्यमंत्रीप्रताप सरनाईकांच्या पाठिशी !

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. भाजपसोबत प्रताप सरनाईक यांनी भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन नाहक त्रास दिला जातोय याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे त्यांच्या पत्राचं सार आपल्या लक्षात आला असेलच, प्रताप सरकारनं शिवसेनेच्या कुटुंबाचे महत्वाचे सदस्य आहेत आणि आमचं शरीर व काळीज दोन्ही वाघाचं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण पक्ष प्रताप सरनाईक यांच्या पाठिशी ठाम उभा आहे, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

आम्ही वाघाच्या काळजाचे माणसं आहोत

संजय राऊत यांनी आज (२१ जून) माध्यमांशी बोलताना हा हल्ला चढवला आहे. आम्ही वाघाच्या काळजाचे माणसं आहोत. आमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं यात आम्ही मोडत नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिलेदार आहोत. आज आम्ही राजकारणात नाहीये तर एक जमाना लोटला आहे. पांढरे झाले. परत काळे करत आहोत. फार फार काय कराल, तुरुंगात टाकाल. आमची तयारी आहे तुरुंगात जायला. आम्ही महाभारताची उदाहरणे देतो. त्या महाभारतातील योद्धे आम्हीच आहोत, असं सांगतानाच माझं नाव संजय आहे, असा इशारा राऊत यांनी दिला.

“प्रताप सरनाईक आणि त्यांचं कुटुंब त्रासात आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करुन त्रास देतंय त्यामुळे भाजपशी जुळवून घेण्याचं वैयक्तिक मत त्यांनी व्यक्त केलंय. पण एक पक्ष म्हणून भूमिका घेण्याचे सर्व अधिकार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. आमच्यात कोणतीही गटबाजी वगैरे नाही. आमच्यात फक्त एकच गट आहे आणि तो म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा गट. त्यामुळे राज्यात पाच वर्ष ठाकरे यांच्या नेतृत्वातच सरकार उत्तम काम करणार, कुणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडी उत्तम समन्वयानं काम करत आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

राज्यातील तिन्ही पक्ष घट्ट नात्याने जोडलेले

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांशी घट्ट नात्याने जोडले आहेत. प्रत्येकजण आपआपल्या पक्षाचा विस्तार करतो. आम्हीही करत असतो. काँग्रेस-राष्ट्रवादीही करत आहे. पक्षाचा विस्तार केला पाहिजे. पण कोणी कोणत्या पद्धतीने लढायचं हे अद्याप ठरायचं आहे. तसेच हे सरकार पाच वर्ष चालवायचं ही तीन पक्षाची कमिटमेंट आहेत. कॉमन मिनिमम प्रोग्राम हाच सरकार चालवण्याचा पाया आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

कितीही फूट पाडा, पाच वर्षे सरकार टिकणार

आम्ही सत्तेत असल्याने काही लोकांची पोटदुखी वाढली आहे. त्यांनी काहाही कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी सरकार पाच वर्षे चालणारच, असं सांगतानाच आघाडीतील तिन्ही पक्षाचा उत्तम समन्वय आहे. आघाडी सरकारचा समन्वय कसा असावा याचं हे उत्तम उदाहरण आहे. हा देशातील आदर्श समन्वय आहे, त्यांनी सांगितलं.

याला फ्रस्टेशन म्हणतात

ज्यांच्याकडे ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय आहे. ते प्रेशर टॅक्टिस वापरत आहेत. पश्चिम बंगालमध्ये तेच झालं. पण ते महाराष्ट्रात चालणार नाही. महाराष्ट्रात आता जे सुरू आहे, त्याला फ्रस्टेशन असं म्हणतात, असा टोला त्यांनी लगावला.सरनाईक यांच्या पत्रामुळे शिवसेनेत दोन गट असल्याची चर्चा आहे. त्याचा राऊत यांनी इन्कार केला. शिवसेनेत एकच ग्रुप आहे. तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा. शिवसेनेत कोणतीही गटबाजी नाही. कोणतेही गट नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरेचं भूमिका घेतात

सरनाईक त्रासात आहेत अडचणीत आहेत. त्यांचं कुटुंब अडचणीत आहे. त्याचं कारण पत्रात दिलं आहे. भाजप विनाकारण त्रास देत आहे असं सरनाईक यांनी म्हटलं आहे. त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी मोदींशी जुळवून घ्यावं, असं ते म्हणतात. ते त्यांचं मत आहे.पण पक्षाची भूमिका उद्धव ठाकरे घेत असतात. त्यांचा विनाकारण त्रासातून मुक्तता कशी करायची हे आम्ही पाहू, असं सांगतानाच संपूर्ण शिवसेना सरनाईक यांच्या कुटुंबाच्या पाठिशी उभी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MaharashtraResult2019 : पवारांच्या ‘त्या’ भाषणामुळे उदयनराजेंचा पराभव

News Desk

“विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच”;थोरातांना पवार म्हणतात,”निवडणुकीबाबत तिन्ही पक्षांनी एकत्र निर्णय घ्यावा”!

News Desk

HW Exclusive : एसटी कर्मचाऱ्यांनी १० तारखेपर्यंत कामावर रुजू व्हा, अनिल परबांचे अल्टिमेटम

Aprna