HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत मनसे- शिवसेना कामगार संघटना आमने-सामने

मुंबई|महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वैर सगळ्यांना माहितच आहे. कायमच सेना-मनसे यांच्यात वाद झालेले आपण पाहिले आहेत. आता पुन्हा एकदा सेना आणि मनसे आमने सामने आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना आणि भारतीय कामगार सेना यांच्यात एक वाद झाला आहे. पवई येथील L&T या कंपनीतील कामगारांच्या समस्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सोमवारी (२५ ऑक्टोबर) कंपनीत पोहोचली होती. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक, विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली आणि रोहन सावंत आपल्या सहकाऱ्यांसमवेत कंपनीत पोहोचले होते. दरम्यान, कामगारांच्या समस्या मांडून मनसेची कामगार सेना कंपनीतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेच्या कामगारांनी काही कामगारांना एकट्यात पाहून अरेरावी करण्यास सुरवात केली. कामगारांसाठी काम करणाऱ्या शिवसेनेच्या कामगार सेनेने हे कृत्य केल्यामुळे मनसे कामगार सेना आक्रमक झाली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना त्यानंतर कामगारांना घेऊन पवई पोलिस ठाण्यात पोहोचली आहे. आत्तापर्यंत कंपनीतील मालकांकडून कामगारांसोबत गैरव्यवहार केला जात होता. पण आता राजकीय पक्षांकडून कामगारांवर असे अत्याचार होत असतील त्याला जबाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मनसे आणि शिवसेना आमने सामने येण्याची ही जरी पहिली वेळ नसली तरी कामगारांसाठी ज्या दोन पक्षांतील संघटना काम करत आहेत त्या समोरासमोर आल्यामुळे आता पुढे काय होणार? आणि दोन्ही पक्षांचे पक्षश्रेष्ठी यावर काही पाऊल उचलणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भोंदू बाबांच्या नादी न लागता डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा ठेवा –  रामदास आठवले

News Desk

विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विधीमंडळाचे १५ दिवसांचे अधिवेशन घ्या

News Desk

‘पूरग्रस्तांना पॅकेज म्हणजे वृत्तपत्रातील प्रसिद्धीची बातमी’, आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला टोला

News Desk