HW News Marathi
Covid-19

चिंता कायम ! राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांचा आकडा २५ हजारांच्या पार

मुंबई । राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कारण, गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहे. राज्याबाबत आज (१८ मार्च) मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल 25 हजार 833 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनास्थिती आता चिंताजनक होताना दिसत आहे.

राज्याच्या कोरोनास्थितीबाबत जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार एक दिलासादायक बाब अशी की, गेल्या २४ तासांत राज्यात 12 हजार 764 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर चिंताजनक गोष्ट अशी की, याच एक दिवसात राज्यात 58 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सद्यस्थितीत राज्यात सध्या 1 लाख 66 हजार 353 रुग्णावर उपचार सुरु आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासांत ७,४६६ कोरोना रुग्णांची नोंद, एका दिवसातील विक्रमी वाढ

News Desk

“दादा लढवय्ये आहेत”, अजित दादांना कोरोना झाल्यानंतर सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट!

News Desk

लसीकरण केंद्रावर पोलीसांसोबत हुज्जत, पोलिसांनी केलेल्या धुलाईचे दृश्य CCtVमध्ये कैद

News Desk