HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रावर पुन्हा कोरोनाचे सावट, मुंबईत पुन्हा लॉकडाऊन होणार?

मुंबई | राज्यात पुन्हा एखदा कोरोना रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. ठाण्यात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. मुंबई, पुण्यातही कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाची स्थिती अशीच कायम राहिली आणि लोक सूचनांचे पालन करत नसतील तर पुन्हा एकदा लाॅकडाऊन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा वस्त्रोद्योग आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे. दरम्यान, आज (९ मार्च) बरोबर १ वर्षापुर्वी पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता.

रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. लग्नासाठी ५० लोकांची परवानगी घेतात पण ३०० लोकांना बोलावतात. नाइट क्लबवर कारवाई सुरू केली आहे. जे हाॅटेल्स मानक प्रणालींचे पालन करत नाहीत, ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना बसवतात अशांचे परवाने रद्द करण्याची कारवाई सुरू केली आहे. जे पर्याय सरकारतर्फे राबवता येतील ते राबविले जात आहेत. पण, आता लाॅकडाऊन नको असेल तर लोकांनी नियमांचे पालन करायला हवे. असे शेख म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरोग्य विभागाच्या परीक्षार्थ्यांना राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचे ‘हे’ आवाहन

News Desk

मी मुख्यमंत्र्यांकडे ३ आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लावण्याची मागणी करणार ! 

News Desk

देशात पुन्हा पुर्ण लॉकडाऊन होणार? अमित शहा म्हणतात…

News Desk