HW News Marathi
Covid-19

आरोग्य विभागाच्या परीक्षार्थ्यांना राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचे ‘हे’ आवाहन

मुंबई | राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका पत्राद्वारे आरोग्य विभागाच्या परीक्षार्थींना शुभेच्छापर संदेश दिला आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी उद्या म्हणजेच रविवारी (२८ फेब्रुवारी) राज्यातील विविध जिल्ह्यांत परीक्षा घेण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर,आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका पत्राद्वारे परीक्षार्थींना शुभेच्छा देत धीरही दिला आहे. हि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन राजेश टोपे यांनी स्वतः ट्विट करत परीक्षार्थ्यांना केले आहे.

राजेश टोपे आपल्या पत्रात म्हणतात कि, “सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षार्थींना माझ्या शुभेच्छा ! विविध पदांसाठी ही भरती होत असून केवळ गुणवत्तेच्या आधारावरच उमेदवारांची निवड केली जाणार आहे. परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे, फक्त गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करा”, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. दरम्यान, राज्यभरात आरोग्य विभागातील एकूण ५ हजार जागांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धडकने लगा दिल, नजर झुक गई कभी उन से जब ‘सामना’ हो गया, – भाजपची राऊतांवर टिका

Arati More

“हे सरकार आहे की सर्कस?”, लॉक-अनलॉकच्या गोंधळावरून अतुल भातखळकरांचा सरकारवर निशाणा!

News Desk

मुंबईचे नवीन महापालिका आयुक्त चहल आज हाॅटस्पाॅट धारावी व नायर रुग्णालयाला देणार भेट

News Desk