HW News Marathi
महाराष्ट्र

नाना पटोले यांचा पुन्हा मोदी सरकारवर हल्लाबोल

अकोले- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, ते लगेच चिडतात, असे जाहीर वक्त्यव्य करून खळबळ उडवून देणारे भाजपचे खासदार नाना पटोले यांनी पुन्हा मोदी सरकारवर शरसंधान साधले आहे.अंबानी-अदानीच्या फायद्याचे निर्णय घेऊन त्यांच्यासोबत आपलीही घरे भरण्याचे काम देशात सुरू असल्याचा सनसनाटी आरोप नाना पटोले यांनी अकोल्यातील शेतकरी संवाद सभेत केला. त्याचवेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ठोस पावलं उचलली न गेल्यास इतिहासाची पुनरावृत्ती करू, असं सांगत त्यांनी राजीनाम्याचे संकेत दिले. शेतीच्या पाण्यासाठी व्यवस्थाच निर्माण झालेली नाही. नदी जोड प्रकल्पाकडे दुर्लक्ष का केलं जातंय? शेतकरी निसर्गावरच अवलंबून राहिला पाहिले, हाच त्यामागचा हेतू आहे. त्यामुळे उत्पादन कमी मिळेल आणि मग विदेशातून धान्य आणता येईल. विदेशातील या धान्यात अंबानी-अदानीला फायदा कसा करून देता येईल आणि त्याच्या कमिशनमधून आम्हाला घरं कशी भरता येतील, हेच सुरू आहे, असा घणाघातील हल्लाबोल नाना पटोले यांनी केला. राज्यातील देवेंद्र सरकारलाही पटोले यांनी पुन्हा लक्ष्य केलं. कुणाच्या खुर्चीवर असल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न मांडता येत नसतील तर ती खुर्चीच परत देऊ, असं त्यांनी निक्षून सांगितलं. २००९ मध्ये नाना पटोले काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्याची आठवण करून देत, येत्या काही दिवसांत कर्जमाफीबाबत ठोस निर्णय झाल्यास आपण इतिहासाची पुनरावृत्ती करू, असं त्यांनी सूचित केलं. त्यामुळे आता नानांचं हे बंड पेटणार की शमणार, याकडे राजकीय वर्तळात चर्चा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वतःवर आरोप झाले की सामोरं जायचं नाही हे शूरपणाचे लक्षण नाही! – दिलीप वळसे-पाटील

Aprna

कारागृहात मसाज, फेशियल, पेडिक्‍युअर सुविधा प्रकरणी इंद्राणी मुखर्जीची चौकशी होणार

News Desk

ST कर्मचाऱ्यांसोबत अरेरावीची भाषा करणे योग्य नाही; राज ठाकरेंची सरकारवर टीका

News Desk