HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊतांनी माझ्या मनातलं बरोबर ओळखलं,नाना पटोले आणि राऊतांंचं सूत पुन्हा जुळलं !

मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या चर्चेत आहेत. महाविकासआघाडी विरोधात सतत करत असलेल्या टीकांमुळे ते सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी केलेल्या स्वबळाच्या टिकेवरून राजकीय चळवळींना उधाण आलं आहे. याच टिकेवरून आता पटोले सारवासारव करताना दिसत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या अग्रलेखातून जोरदार बॅटिंग केल्याचं दिसून आलं. त्यांच्या या अग्रलेखावर, “हा अग्रलेख म्हणजे माझ्या मनातील भावना आहेत. संजय राऊत यांनी माझ्या मनातलं बरोबर ओळखलं आणि तेच अग्रलेखात लिहिलं”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

राऊतांनी माझ्या मनातलं ओळखलं

नाना पटोले हे सध्या महाविकासआघाडी मध्ये सुरु असलेल्या तणावाबद्दल बोलताना दिसत आहे. मात्र आजच्या (१४ जुलै) सामना अग्रलेखाचा त्यांनी सकारात्मक दृष्टीने स्वागत केलं आहे. “आजच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी माझंच मत मांडले. भाजपने देशात अस्थिरतेचं वातावरण निर्माण केलंय, काँग्रेस राज्य आणि देशात लढाई लढत आहे. विरोधक सातत्याने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करतायत. आम्ही आमची लढण्याची भूमिका आहे”, असं नाना पटोले म्हणाले. पुढे बोलताना नानांनी २०२४ ला महाराष्ट्रात काँग्रेसच नंबर वन पक्ष असेल, अशी पुन्हा एकदा भविष्यवाणी केली. तसंच महाराष्ट्र हे काँग्रेसचं राज्य आहे, हे सांगायला देखील पटोले विसरले नाही आहेत.

काय होता अग्रलेख

नाना पटोले हे मोकळय़ाढाकळय़ा स्वभावाचे आहेत. जसे भाजपात रावसाहेब दानवे तसे काँग्रेस पक्षात नाना. नाना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून सतत चर्चेत आहेत ते त्यांच्या वक्तव्यांमुळे. नाना त्यांची मन की बात व्यक्त करतात. सध्याचा अतिजागरूक मीडिया त्यांच्या मन की बातची बातमी करून मोकळा होतो. मग लोकांना वाटते आता महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार. तीन पक्षांत वाद, फाटाफूट होणार व सरकार पडणार, पण तसे काहीच घडत नाही व नाना त्यांच्या पुढच्या कामास म्हणजे बोलण्यास लागतात. आता पुन्हा नानांच्या ताज्यातवाण्या वक्तव्याने चहाच्या पेल्यातले वादळ निर्माण झाले असे म्हणतात. लोणावळय़ातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिबिरात नानांनी ‘ताव’ मारला की, ‘आपल्यावर पाळत ठेवली जात आहे. मला सुखाने जगू दिले जाणार नाही.’ नाना पुढे असेही म्हणाले की, ‘काँग्रेसचा स्वबळाचा नारा कायम आहे’. नानांच्या या वक्तव्यांमुळे काँग्रेसला बळ मिळाले असेल तर ते बरेच आहे. नानांनी स्वबळाचा नारा याआधीही दिलाच आहे व त्यात काही चुकले असे वाटत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी आपल्या शैलीनुसार ‘स्वबळा’स उत्तरे दिलीच आहेत. आम्ही एकत्र सरकार चालवतो, पक्ष नाही असे श्री. पवार यांनी जाहीरपणे सांगितले ते योग्यच आहे. नाना काय काय बोलतात व कसे डोलतात यावर महाराष्ट्र सरकारचे भवितव्य अजिबात अवलंबून नाही.

नाना पटोले काय म्हणाले?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करत आपलं मत व्यक्त केला आह. “मी जे बोललो त्यात माघार घेणारच नाही. स्वबळावरच निवडणूक लढवणार. त्यामुळे आपण कामाला लागा. मी माध्यमांशी बोलताना म्हणालो की, मुख्यमंत्र्यांनी काल शिवसैनिकांना कामाला लागण्याबद्दल सांगितलं. मग मी बोललो होतो तर त्रास होत होता, ते बोलले तर ठीक आहे. काही नाही”, असा चिमटा पटोले यांनी उद्धव ठाकरेंना काढला. यावेळी अजित पवार यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. “आता बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री आहेत ते कुणाची कामं करतात… आपल्या लोकांची कामं करतात का? मग आपण संपर्कमंत्र्यांना लक्ष घालायला सांगतो, पण संपर्कमंत्र्यांचं ऐकायचं की नाही ते त्यांनी ठरवायचं… कारण सही त्यांची लागते. संपर्कमंत्र्यांची सही लागत नाही,” असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वयंस्फूर्तीने ‘घरोघरी तिरंगा’ अभियान यशस्वी करा, मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

Aprna

“मुंबईत असा कोणता बाबा तयार झाला आहे जो स्वत:ला एवढा मोठा गुंड समजतो”, फडणवीस कडाडले  

News Desk

आपण यांना पाहिलात का?

News Desk