HW News Marathi
देश / विदेश

‘राज्याला ड्रायव्हर नको, लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवा’, नारायण राणे यांचं ठाकरेंवर टीकास्त्र

नवी दिल्ली | कोकणात मुसळधार पावसाने गेले ३ दिवस थैमान घातलं आहे आणि नद्या वाहून नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. बाजारपेठ, अनेक घरं पूर्ण पाण्याखाली गेली आहेत. अशावेळी नागरिकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्याची गरज व्यक्त केली आहे. मात्र या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्र सरकार हेलिकॉप्टरसह सर्व मदत करेल असं आश्वासन दिलं आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निशाणा साधला आहे.

राज्याला चांगला ड्रायव्हर नको, चांगला मुख्यमंत्री हवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंढरपूरला महापूजेसाठी स्वतः गाडी चालवत गेले होते. या गोष्टीवरून अनेक विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. ‘राज्याला चांगला ड्रायव्हर नको, चांगला मुख्यमंत्री हवा’ असं म्हणत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मुख्यमंत्री गाडी चालवत पंढरपूरला गेले, पण दुर्घटनेत मृत्यू झालेल्या लोकांकडे, त्यांच्या कुटुंबीयांकडे पाहण्यासाठी त्यांना वेळ नाही. राज्याला ड्रायव्हर नको आहे तर चांगला मुख्यमंत्री हवा आहे असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. कॅबिनेटला जायचं नाही आणि पंढरपूरला जायचं यात काय भूषण आहे, असा खोचक टोला नाराय राणे यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रात मागील 24 तासांमध्ये कोसळधार सुरूच आहे. खासकरून रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आणि मुसळधार पावसाचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. तसंच बचावकार्य करणाऱ्या सगळ्या यंत्रणांनी सतर्क राहून काम करावं असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

कोकणात रेड अलर्ट

कोकणात ३ दिवस सतत पाऊस चालू आहे. यातच हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा इशारा सांगितला असून रेड व ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्रयं कडून पाहणी

चिपळूण आणि महाड मधल्या पुराचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे. मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टरमधील बचाव पथकाला ते दिसतील असे आवाहन प्रशासनाने केले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली. बचाव कार्य व रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरु करावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पाणी ओसरलं आहे. पण महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले असून बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#PulwamaAttack : शहीद जवानांमध्ये महाराष्ट्रातील २ सुपुत्रांचा समावेश

News Desk

मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुखांना दिलासा, फेटाळली ‘ही’ याचिका

News Desk

राऊत – शेलार भेटीवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया ! नाना पटोले म्हणाले…

News Desk