HW News Marathi
देश / विदेश

नारायण राणेंची केंद्रात वर्णी ,कसा आहे राणेंचा राजकीय प्रवास ?

नवी दिल्ली | राजकारण म्हंटलं कि त्यात मतभेद, वादविवाद हे होताच असतात. विरोधी पक्षांमानधला वाद ना काय राजकारणामध्ये नवीन नव्हे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेटपणे अंगावर घेणाऱ्या नेत्यांची नावे घ्यायची झाली तर त्यामध्ये नारायण राणे हे नाव अग्रस्थानी असेल. अशा नारायण राणेंना आता भाजपने थेट मंत्री केलय.मोदींच्या बैठकीत पहिल्या रांगेत,मंत्रीपदाच्या यादीत पहिलं नाव,राणेचे एकेकाळी कट्टर शिवसैनिक असणारे नारायण राणे काँग्रेस, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असा प्रवास करुन आता भाजपमध्ये स्थिरावले आहेत. कट्टर शिवसैनिक, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री आणि आता थेट केंद्रीय मंत्रीप. नारायण राणे यांच्या राजकीय प्रवास कायमच चर्चेचा विषय बनला आहे.

नारायण राणेंची राजकीय कारकीर्द

एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेले नारायण राणे आता थेट भाजपच्या विधिमंडळाचे मंत्री बनले आहेत. नारायण तातू राणे यांचा जन्म २० एप्रिल १९५२ रोजी कोकणात झाला. मोठा जनाधार असलेल्या कोकणातील नेत्यांमध्ये नारायण राणेंचा समावेश होतो. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आक्रमक स्वभावाचे नारायण राणे शिवसेनेत वेगाने पायऱ्या चढत वर गेले. सुरुवातीला चेंबुरमध्ये शाखाप्रमुख असलेले राणे १९८५ साली मुंबई महानगरापालिकेच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर १९९० साली कणकवली-मालवण मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले. १९९५ मध्ये युतीची सत्ता आल्यावर त्यांच्याकडे दुग्धव्यवसाय विकास, पशु संवर्धन, मत्स्यव्यवसाय, खार जमिनी, विशेष सहाय्य व पुनर्वसन, उद्योग या खात्यांचा कारभार सोपवण्यात आला.

भाजपमध्ये प्रवेश केल्यावर राज्यसभेवर वर्णी लागली

१९९७ साली त्यांच्याकडे महसूल खाते सोपवण्यात आले. मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर १९९८ ते ९९ या काळात त्यांनी या पदाची धुरा सांभाळली. २००५ साली शिवसेना सोडून ते काँग्रेसमध्ये गेले. २००९ मध्ये पुन्हा काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यावर राणेंना उद्योग खातं मिळाले. त्यानंतर आता भाजपमध्ये आल्यानंतर नारायण राणे यांच्या राज्यसभेवर वर्णी लागली.

काँग्रेसमधील कारकीर्द

शिवसेना सोडल्यानंतर, काँग्रेसमध्ये प्रवेश प्रवेशानंतर करूनही नारायण राणे स्वस्थ नव्हते. राणेंची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्रिपदाची होती. यातूनच ज्या विलासराव देशमुखांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणलं त्यांच्याचविरोधात राणेंनी आघाडी उघडली. २००९ मध्ये पुन्हा काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यावर राणेंना उद्योग खातं मिळालं. याच दरम्यान सोनिया गांधी, अहमद पटेल, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करून राणेंनी हायकमांडची खप्पामर्जी ओढावून घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण महत्त्वपूर्ण वळणावर, तपास NIA कडे

News Desk

कार्ती चिदम्बरम यांच्या घरावर ईडीचे छापे

News Desk

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्ताने मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांचे ट्वीटद्वारे अभिवादन

News Desk