HW News Marathi
महाराष्ट्र

डोंगरी इमारत दुर्घटना | सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही दुर्घटना घडली !

मुंबई | मुंबईच्या डोंगरी येथील इमारत दुर्घटनाप्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन अधिकार्‍यांना दंडीत करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. “डोंगरी भागात आज (१६ जुलै) रिपेअर बोर्डाची इमारत कोसळून १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक जखमी आहेत. ही घटना सरकारच्या नाकर्तेपणामुळे घडली आहे” असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. “अशा धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्याची जबाबदारी रिपेअर बोर्डाची होती. धोकादायक होत्या तर तेथील लोकांचे पुनर्वसन का करण्यात आले नाही ?”, असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

“रिपेअर बोर्डाला लोक सेस देत आहेत. त्यामुळे दुरुस्ती व पुनर्बांधणीची जबाबदारी त्यांची आहे. तरीही ही घटना घडते म्हणजे रिपेअर बोर्डाचा नाकर्तेपणा समोर आला आहे. त्यांच्यावर कुणाचा वचक नाही”, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. “मुंबईत वारंवार अशा घटना घडत आहेत. कधी आगीमध्ये लोकांचा जीव जातोय तर कधी पुल कोसळून लोकं मरत आहेत. तर काही ठिकाणी बुडून लोकं मरत आहे.या प्रकरणात कुणावर जबाबदारी निश्चित होत नाही. त्यामुळे या दुर्घटना थांबत नाहीत”, असेही नवाब मलिक म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, मागासांना आरक्षणाचा सर्वाधिक लाभ द्या, आठवलेंची मागणी

News Desk

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, मराठवाड्याच्या पाण्यासाठी नदीजोड प्रकल्पास मान्यता

News Desk

“शशिकांत शिंदे आणि मी एकच आहे…”, शिवेंद्रराजे यांचे मोठे विधान

News Desk