HW News Marathi
महाराष्ट्र

“राम्या पोरी पळव…पंकु चिक्की घे…”, राष्ट्रवादीची जोरदार टीका

मुंबई | बालभारती पुस्तकातील संख्यावाचनाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने भाजपवर प्रचंड टीका केली. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधला होता. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपच्या नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये आणि घोटाळ्यांचा आधार घेत राष्ट्रवादीने भाजपला ‘जोड्या लावा’चा स्वाध्यायच सोडवायला दिला आहे. “राम्या पोरी पळव, पंकु चिक्की घे, दाजी साल्या म्हण, नितीन टोल भर, विनोद जोक मार”, अशा बोचऱ्या वाक्यांचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली आहे.

बालभारती पुस्तकातील संख्यावाचनाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने भाजपवर टीका केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार आणि छगन भुजबळ यांना टोला लगावला होता. “छगन कमळ बघ, शरद गवत आण”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची खिल्ली उडवली. तसेच या नावांचा कोणत्याही राजकीय नेत्याशी संबंध जोडू नये, असाही खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला होता. त्यावर, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप नेत्यांची व्यंगचित्रे आणि वक्तव्यांचा, घोटाळ्यांचा वापर करत भाजपवर टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन!

News Desk

माझ्या विरोधात ईडी, सीबीआयची नोटीस काढून दाखवा !

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्वपूर्ण बैठक होणार

News Desk