HW News Marathi
महाराष्ट्र

“पराभूत झालो तरी संपलो नाही”, पंढरपूरच्या निकालानंतर भगीरथ भालकेंची पहिली प्रतिक्रिया

पंढरपूर | बहुचर्चित अशा पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूकीचा काल (२ मे) निकाल लागला. राष्ट्रवादी आणि भाजपसाठी ही महत्वाची निवडणूक होती. दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दरम्यान, राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भारत भालके यांचा भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी पराभव केला. पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया भगीरथ भालके यांची समोर आले आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली होती.

“काल झालेल्या मतमोजणीत निसटत्या मताने पराभव झाला असला तरी आज सकाळपासून पुन्हा कामाला सुरुवात केली असून जनतेने यावेळी वडिलांपेक्षा जास्त १५ हजार मतांचा आशीर्वाद दिल्याने पुढच्यावेळी पराभवाचे उट्टे काढेन”, असा विश्वास राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे.

सर्व शक्ती एकत्र येऊन आपल्या विरोधात लढल्या असल्या तरी मतदारसंघातील जनतेने गेल्यावेळी पेक्षा १५ हजार मतांची वाढ झाली आहे. आपले वडील देखील २००४ साली पहिल्यांदा पराभूत झाले होते, मात्र लगेच दुसऱ्या दिवशी पासून पुन्हा जनतेत मिसळून काम केले आणि नंतर ३ वेळा विजयी झाले होते. तीच लढायची शिकवण वडिलांनी दिली असून पुढच्या वेळी या पराभवाचे उट्टे काढेन असे भगीरथ भालके यांनी सांगितले आहे.

विजयी झाल्यावर वडिलांप्रमाणे शड्डू ठोकण्याचा प्रयत्न विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना बाजूला राहून शड्डू ठोकण्यापेक्षा २०२४ च्या निवडणुकीत समोर या मग शड्डू कोण ठोकतोय ते दाखवून देईन असा टोला भगीरथ यांनी लगावला आहे. आजही भारत भालके यांच्याच प्रमाणे कार्यकर्त्यांची गर्दी भगीरथ यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात दिसत असून पराभूत झाले तरी आम्ही तुमच्या सोबत असल्याचे कार्यकर्ते दाखवून देत आहेत, असं ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुत्र्यांच्या हल्ल्यातील मृत बालिकेच्या कुटुंबियांना १५ लाखांची भरपाई

News Desk

ड्रोनद्वारे मेंढपाळांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्यावर पुष्टवृष्टी करत लोकार्पण! – गोपीचंद पडळकर

Aprna

 देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला,शरद पवारांची मिष्किल टिप्पणी 

News Desk