HW News Marathi
महाराष्ट्र

गृहमंत्री बदलाची कोणतीही चर्चा नाही – जयंत पाटील

मुंबई | वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित केल्यानंतर राज्याचे गृहमंत्र्यांनाही पदावरुन काढण्याची मागणी होऊ लागली आणि तशा चर्चाही राजकीय वर्तृळात सुरु झाल्या. दरम्यान, या सगळ्या चर्चांना तुर्तास तरी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुर्णविराम दिला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख चांगलं काम करत आहेत. गृहमंत्री पदासाठी कोणाचीही नावं समोर नाही आहेत तसेच, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नाही, असं जयंत पाटील यांनी आज (१५ मार्च) प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आणि नेत्यांची बैठक होणार आहे त्या बैठकीआधी जयंत पाटील पत्रकारांशी बोलत होते.

राज्यातील गृहमंत्रीपदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यावर सोपवली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, खांदेपालट होण्याची शक्यता नाही, असं स्पष्टीकरण जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे. “गृहमंत्री अनिल देशमुखचं राहणार. व्यवस्थित काम सुरु आहे. कोणतेही बदल करण्याची आवश्यकता नाही”, असं जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले की, ‘सरकार कोणालाही पाठीशी घालत नाही आहे. गृहमंत्री अनिल देशमुखच राहतील’. दरम्यान, जो काही निर्णय असेल तो शरद पवार घेतील असंही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या स्पष्टीकरणामुळे गृहमंत्री पदावरुन अनिल देशमुख यांची बदली होणार नाही हे जरी स्पष्ट झाले असले तरी आयुक्तांची खुर्ची अजून वादात असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या या बैठकीनंतर राजकीय वर्तृळात काही बदल होतात का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे,

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण : आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप

News Desk

शरद पवार आज राज्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर

News Desk

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण । तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

News Desk