HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई पोलिसांची नाचक्की करणाऱ्या गृहमंत्र्यांना हटवावं, भाजपची मागणी

मुंबई | “सचिन वाझे प्रकरणातील जी मोठी नावं बाहेर येत आहेत, किंवा येतील, त्यातून मुंबई पोलिसांची होणारी नाचक्की खेदजनक आहे. अशा लोकांना पाठीशी घालणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जाणते राजे आहेत, मुंबई पोलिसांची नाचक्की करणाऱ्या गृहमंत्र्यांना हटवावं” अशी मागणी भाजप नेते प्रसाद लाड यांनी केली आहे. याच वेळी राष्ट्रवादीच्या गोटातही हालचालींना वेग आलेला असल्यामुळे गृहमंत्रिपदाचे खांदेपालट होणार का, हा प्रश्न विचारला जात आहे.

प्रसाद लाड काय म्हणाले?

“सचिन वाझे प्रकरणात रोज नवनवीन उलगडे होत आहेत. स्कॉर्पिओ किंवा इनोव्हा कार असो, किंवा आणखी पोलीस अधिकाऱ्यांची नावं असो. यामध्ये मुंबई पोलिसांची नाचक्की केली गेली, त्याला कारण कोण आहे. त्याला पाठीशी घालणारे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी मी वारंवार विधानपरिषदेत करत होतो” असं प्रसाद लाड म्हणाले आहेत.

“अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्याशिवाय या प्रकरणाचा छडा लागणार नाही. शरद पवार महाराष्ट्राचे जाणते राजे मानले जातात. त्यांच्या पक्षाचा गृहमंत्री गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला पाठीशी घालत असेल. तर ही खेदजनक गोष्ट आहे. गृहमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे” अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उस्मानाबादमध्ये अजित पवारांनी घडवलं माणुसकीच दर्शन

News Desk

राज्यात पत्र लिहिण्याचा नवा ट्रेंड आला, वाझेंच्या पत्रावर राऊतांची प्रतिक्रिया

News Desk

OBC आरक्षणासंदर्भात मोठी बातमी, निवडणुकांना स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार!

News Desk