HW News Marathi
महाराष्ट्र

“भाजपच्या पोकळ धमक्यांना राज्यातील कुठलाही नेता घाबरत नाही” -नवाब मलिक

मुंबई | महाराष्ट्रात सध्या शिवसेना आणि भाजप यांच्यात युद्ध सुरु आहे. त्यात भाजपने आता राष्ट्रवादीलाही खेचलं आहे. सत्तेचा कितीही दुरुपयोग करा. परंतु भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला सुनावले आहे.

भाजपला जे करायचे आहे ते करावे

भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री व नेत्यांना धमक्या दिल्या असून याचा नवाब मलिक यांनी समाचार घेतला आहे. भाजपला जे करायचे आहे ते करावे. कुणाच्याही विरोधात तक्रार दाखल करावी. नकली केसमध्ये अडकवा किंवा जेलमध्ये ठेवा. सत्तेचा दुरुपयोगही करा ही काय नवीन गोष्ट नाही, असेही मलिक यांनी म्हटले आहे.

प्रत्येकाला वाटतं आमच्याविरोधात सूडाने कारवाई होत आहे

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे त्यांच्या बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांच्या सामना अग्रलेखावरून भाजप कडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती, त्याला आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “सूडबुद्धीची एकदा व्याख्या समजून घेतली पाहिजे. प्रत्येकाला वाटतं आमच्याविरोधात सूडाने कारवाई होत आहे. सूडाने कारवाया करायला आमच्या हातात सीबीआय ईडी नाही. या देशात कुठे आणि काय सूडाने कारवाया होतात या संदर्भात आम्हाला बोलायला लावू नका.

अनिल देशमुख आणि प्रताप सरनाईक आणि देशातील अनेक लोकं यांच्याविरोधात ज्या कारवाया सुरू आहेत. त्याला सूडाच्या कारवाया म्हणतात. तुमच्याकडे तपास यंत्रणा आहेत म्हणून तुम्ही सूडाच्या कारवाया करता आणि त्या सूडाच्या कारवायांना कायदेशीर कारवाया म्हणता. महाराष्ट्र धमकीबद्दल कारवाई झाली तर ती सूडाची कारवाई? ती सूडाची असेल तर बिनबूडाची असेल. कारवाई कायदेशीर असते. जर कायदेशीर कारवाई नसेल तर ती न्यायालयात टिकत नाही. अजूनही या देशातील न्यायालये काही प्रमाणात स्वतंत्र आहेत. आणि न्यायबुद्धी स्वतंत्र बाण्याने अजूनही न्यायदान करत असते”,असंही राऊत म्हणाले आहेत.

भाजप कुणावरही कारवाई करू शकतो

पुढे बोलताना संजय राऊतांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. भाजप कुणावरही कारवाई करू शकतो. इतका महान पक्ष आहे तो. तो परग्रहावरील लोकांवरही गुन्हे दाखल करेल. त्यांच्या हातात यंत्रणा आहे. ते काही करू शकतात, असा हल्ला राऊत यांनी चढवला आहे. तुम्हाला या थप्पडीचा आवाज सहा वर्षाने ऐकायला आला का? तुमच्या कानात काही तरी प्रॉब्लेम दिसतोय. आमच्याकडे कानाचे सर्जन आहेत. ज्यांना ही थप्पड सहा वर्षानंतर ऐकायला आली त्यांच्याकडे सर्जन पाठवून देण्यात येईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमरावती हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

News Desk

जिजाऊ माँसाहेबांच्या स्वाभिमानी विचारांवरच महाराष्ट्राची वाटचाल राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक वंदन

News Desk

“आता राज्यातील सर्व गुन्ह्यांची उकल ‘NIA’ने करावी का?”; भाजपचा सरकारला सवाल

News Desk