HW News Marathi
महाराष्ट्र

…म्हणून भाजपवाले गल्लीबोळात यात्रा काढत आहेत-जयंत पाटील

सांगली | भाजपने काढलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेचा नुकताच समारोप सोहळा सांगलीत पार पडला.या आत्मनिर्भर यात्रेवर राष्ट्रवादीचे नेते तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत टीका केली आहे.

महाराष्ट्र आणि देशात यात्रा काढायच्या आधी दिल्लीत तुमच्या दारात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांशी बोला, त्यांना हा कायदा कसा चांगला आहे हे पटवुन द्या.

शेतकऱ्यांना जर पटले तर उपोषणाला बसलेले शेतकरी परत जातील,असे मत जयंत पाटील यांनी मांडले आहे.दिल्लीत उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे तुमच्याकडे उत्तर नाही, म्हणून भाजपवाले गल्लीबोळात यात्रा काढत आहेत,असा टोलाही यावेळी जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे. रयत क्रांती संघटनचे नेते सदाभाऊ खोत यांनी २४ डिसेंबरपासून या यात्रेला सुरुवात केली होती. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आरंभ केला होता तर देवेंद्र फडणवीस यांनी या यात्रेची सांगता केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री Vs राज्यपाल : वाचा सत्ताधारी आणि विरोधकांनी दिलेल्या प्रतिक्रिया

News Desk

सलग बाराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

News Desk

“केंद्रावर दुगाण्या झाडण्यापेक्षा आधी आपल्या अधिकाऱ्यांना झोपेतून जागे करा”, भाजपचा राष्ट्रवादीला पलटवार

News Desk