HW News Marathi
महाराष्ट्र

कालपासून ईडीचं कोणी आलं नाही, माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय – संजय राऊत

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (२८ डिसेंबर) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कालपासून ईडीचे कोणीच आले नाही असं सांगितले आहे. राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्याप्रकरणी ते बोलत होते. संजय राऊत यांनी यावेळी बोलताना भाजपला टोला लगावला आहे. आता मी माझा माणुस पाठवला आहे भाजपच्या आँफिसमध्ये पाठवला आहे, असा टोला संजय राऊत यांनी लागवला आहे. हे सर्व राजकारण ज्यांना करायचं आहे त्यांना करुद्या, असंही ते म्हणाले. ईडीची नोटीस याबद्दल शिवसेना भवनात दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत सविस्तर बोलणार आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली. त्यानंतर आता संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया ट्विटद्वारे दिली आहे. कुणात किती ताकद आहे हे पाहूच असं ट्विट करत त्यांनी ईडीला आणि मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे आव्हानच दिलं. मागील अनेक दिवसांपासून संजय राऊत यांनी उघडउघड भाजप आणि मोदी सरकारवर टीका केल्यानेच ही ईडीची नोटीस पाठवल्याचा आरोप शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus : पश्चिम-मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकीटात वाढ, गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय

swarit

शिवसेना हिंदुत्वापासून दुर गेली, अमित ठाकरेंचा गंभीर आरोप

News Desk

राज्यात 4 ते 6 सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

News Desk