HW News Marathi
महाराष्ट्र

“मावळमध्ये कोणत्या नेत्याच्या पोराने गोळीबार केला नव्हता”, जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकासआघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली. आज (११ ऑक्टोबर) राज्यभर या बंदला संमिश्र स्वरूपाचा प्रतिसाद मिळाला. तर अनेक ठिकाणी त्याला गालबोट लागल्याचं चित्रंही पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर, भाजपकडून महविकासआघाडी सरकारवर जोरदार टीकाही करण्यात आली. त्यावरून, आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मावळमध्ये कोणत्या नेत्याच्या पोराने गोळीबार केला नव्हता”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोचरी टीका केली. “मावळच्या गोळीबारावेळी जालियनवाला बाग आठवलं नाही का?”, असा सवाल फडणवीस यांनी केला. दरम्यान, त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. “मावळमध्ये पोलिसांच्या हातातून बंदुका घेऊन कोणत्याही नेत्याच्या पोराने गोळीबार केला नव्हता. पुढे झालेल्या चौकशीत हा गोळीबार कसा गरजेचा होता ते देखील न्यायाधीशांनी मान्य केलं होतं”, असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

मावळ आणि लखीमपूरची तुलना नको!

“मावळ आणि लखीमपूरची तुलना करू नका. मावळमध्ये कोणत्याही नेत्याच्या मुलाने तो गोळीबार केला नव्हता. मावळचा गोळीबार हा पोलिसांचा होता. इथे लखीमपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावरून चक्क देशाच्या गृहराज्यमंत्र्याचा मुलाने गाडी चालवली. लखीमपूरच्या घटनेतून सत्तेची मग्रुरी आणि माज दिसतो. शेतकरी कुठलाही तरी याच देशाचा आहे ना? तुमच्या घरातील पोळ्याही तिथूनच आलेल्या आहेत. तेव्हा खाताना तुम्हाला बरं वाटतं? तुमच्या लेखी शेतकऱ्यांची किंमत काय आहे हे कळतंय”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार केला तेव्हा…?” – फडणवीस

“ज्यांनी मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता त्यांना आंदोलनाचा नैतिक अधिकार आहे का? लखीमपूर घटना निंदनीय आहेच. पण मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार केला गेला. त्यावेळी त्यांना जालियनवाला बाग आठवला नाही का?”, असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्याचसोबत, “आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे”, अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेणार! – हसन मुश्रीफ

Aprna

जिल्हा परिषदे आणि खासगी शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होणार, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

Aprna

सरकार स्वत: भिकारी आणि लोकांना भिकारी बनवायचे चाळे सुरू”, मनसेची घणाघाती टीका 

News Desk