HW News Marathi
महाराष्ट्र

“बंद में कभी कभी ऐसा हो जाता है…” – संजय राऊत

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकाआघाडीकडून सोमवारी (११ ऑक्टोबर) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली. मात्र, राज्यातील अनेक ठिकाणी या ‘बंद’ला गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. त्यावरून, भाजपने महाविकासआघाडी सरकारवर चांगलंच तोंडसुख घेतलं. मात्र, आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर अजब प्रतिक्रिया दिली आहे. “आपल्याकडे एक गाणं आहे…प्यार में कभी कभी ऐसा हो जाता है…. तसंच बंद में कभी कभी ऐसा हो जाता है…”, असं म्हणत राऊत यांनी बंददरम्यान विविध ठिकाणी झालेल्या चुकीच्या प्रकारांवर भाष्य केलं आहे.

“आजचा महाराष्ट्र बंद १०० टक्के यशस्वी झाला. शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान करणाऱ्यांवर हात जोडणाऱ्यांचा हात जरी सुटला असेल, तरी शेवटी ते आंदोलन होतं. आपल्याकडे एक गाणं आहे ना…प्यार में कभी कभी ऐसा हो जाता है…. तसंच बंद में कभी कभी ऐसा हो जाता है…”, असं संजय राऊत म्हणाले. राज्यात खरंतर या ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला तर काही ठिकाणी मारहाण, जबरदस्ती, दमदाटी, जाळपोळ असे अनेक प्रकार दिसले. शिवसैनिकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती हाताबाहेरही गेली. त्याचबाबत, राऊत यांनी एबीपी माझाशी बोलतांना ही प्रतिक्रिया दिली.

राजकीय स्वार्थासाठी हा बंद नव्हता!

“तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाच्या चिथावणीला बळी पडून बाहेर पडत असाल आणि त्या अन्नदात्या शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान करत असाल तर काय उपयोग? अन्नदाताच जगला नाही तर तुम्ही कसे जगाल? तुम्ही शांतपणे पाच-सहा तास थांबू शकत नाही? ही त्या मृत शेतकऱ्यांसाठीची आदरांजली आहे. आता त्यांचा अपमान करणाऱ्यांवर हात जोडणाऱ्यांचा हात जरी सुटला असेल, तरी शेवटी ते आंदोलन आहे. राजकीय स्वार्थासाठी हा बंद नव्हता. एखाद्या पक्षाला फायदा व्हावा म्हणून हा बंद नव्हता”, असंही संजय राऊत यवेळी म्हणाले.

“लखीमपूरमधील घटनाही राज्यपुरस्कृत होत्या का?”

“विरोधक जर म्हणत असतील तर की हा बंद राज्य पुरस्कृत होता. तर मग लखीमपूरमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या ज्या निर्घृण हत्या झाल्या, तो अतिरेकही राज्य पुरस्कृत होता का? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पाठिंब्याने या हत्या झाल्या की पंतप्रधानांच्या? हा प्रश्न आहे, पण आम्ही असं म्हणणार नाही. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांचा या लखीमपूर घटनेशी संबंध नाही. कुणीतरी बेदरकारपणे ते केलं आहे. पण आता सरकारनं किंवा कायद्याने त्याचं काम करावं”, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्याच्या उपमहापौरपदी RPI च्या सुनिता वाडेकर यांच नाव निश्चित

News Desk

गर्दीत कोरोना चेंगरून मेला की काय असे मला वाटले!

News Desk

सर्वसामान्यांची पिळवणूक करणारा अर्थसंकल्प! – अशोक चव्हाण

News Desk