HW News Marathi
महाराष्ट्र

‘भारतरत्नांनी’ पदाला साजेसं असंच बोलावं वागावं व लिहावं’, राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका  

मुंबई | शेतकरी आंदोलनावरुन सुरु झालेलं सोशल मीडियावरचं वॉर थांबायचं नाव घेताना दिसत नाही. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्याचा इशारा दिल्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं आहे.

“सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे. मग मंगेशकर असोत की तेंडुलकर! ‘भारतरत्नांनी’ पदाला साजेसं असंच बोलावं वागावं व लिहावं. फडणवीसांनी भारतरत्नांची बाजू घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर,डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा आदर्श परिपाठ सुद्धा वाचून घ्यावा”, असा हल्लाबोल अमोल मिटकरी यांनी केला. ट्विटरवर त्यांनी हे भाष्य केलं आहे.

काय म्हणाले होते अनिल देशमुख?

पॉप सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर, त्यावर प्रतिक्रिया देतांना अनेक सेलिब्रिटजनी ट्विट केलं होतं. परदेशी व्यक्तींनी बोलू नये, भारत एक आहे, देशातील प्रश्न आमचे आम्ही सोडवू अशा आषयाचे ट्विट लता मंगेशकर, सचिन तेंडुलकरसह दिग्गज सेलिब्रिटींनी केले होते. मात्र शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याचं सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पेडणेकरांचं स्पष्टीकरण म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा…”, किरीट सोमय्यांचं नवं ट्वीट

Manasi Devkar

आंदोलनाची नौटंकी करून भाजपला आपले पाप झाकता येणार नाही नाना पटोले!

News Desk

मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’चा माफीनामा

News Desk