HW News Marathi
महाराष्ट्र

पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेणे म्हणजे राजकारण करणे नव्हे !

सांगली | सतत पडणाऱ्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगलीला मोठा फटका बला आहे. राज्यभरात अडकलेल्या पूरग्रस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक नागरिकांच्या घरात पूराचे पाणी शिरले आहे. राज्यातील पूर परिस्थितीवर सर्व नेत मंडळी पाहणी करून ग्रामस्थाना मदत करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागाला काल (१० ऑगस्ट) भेट दिली. यावेळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पवार म्हणाले की, “पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेणे म्हणजे राजकारण करणे नव्हे,” असे म्हणत मुख्यमंत्र्यांना टोला लगावला

पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेणे म्हणजे राजकारण करणे नव्हे, हे राज्य सरकारला सांगण्याची वेळ आली आहे. पूरग्रस्तांना दहा-पंधरा हजार रुपयांची मदत देण्याऐवजी त्यांना विश्वासात घेऊन चांगली घरे बांधून देणे महत्त्वाचे आहे, असे म्हणत पवारांनी मुख्यमंत्र्यांना टीका केली. पवारांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर देखील निशाणा साधला. पवार म्हणाले की, “प्रशासन आणि सरकार सर्व काही चांगले आहे असे समजून चालले आहे. त्यामुळेच पूरग्रस्तांवर हे संकट ओढवले आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याच्या नावावर काहीजण सेल्फी काढण्यासाठी जात असतील तर इथली स्थिती लवकर ठीक होईल, असे मला वाटत नाही.”

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार

News Desk

रेणू शर्माने मलाही रिलेशनमध्ये येण्यासाठी दबाव आणला होता, भाजप आमदाराचा आरोप!

News Desk

नारायण राणे, उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर येणार!

News Desk