HW News Marathi
महाराष्ट्र

महापुराच्या संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

सांगली | ‘न भुतो न भविष्यती‘ अशा महापुराच्या संकटातून कोल्हापूर आणि सांगलीमहापुराच्या संकटातून ग्रामीण व शहरी जनतेला बाहेर काढण्यासाठी, त्यांच्या नुकसानाची योग्य भरपाई करण्यासाठी, बाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी, मूलभूत सोयीसुविधा पुनर्स्थापित होण्यासाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करावे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल (२० ऑगस्ट) भेट घेतली.

कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पवारांनी पत्रकार परिषदेत पूरग्रस्त भागातील लोकांचा संसार कोलमडला त्यांना मदतीची गरज असल्याचे सांगत राज्यसरकारचे लक्ष वेधले. यानंतर राज्यसरकारने काल मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काही धोरणात्मक निर्णय घेतल्याचे दिसून येते.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सर्वपरीने पूरग्रस्तांच्या मदतीला हातभार लावण्यात येत आहे . पवार यांनी बारामतीमध्ये काही तासामध्ये पूरग्रस्तांसाठी एक कोटीचा निधी उभारला आहे. तर पक्षाच्या खासदार-आमदारांसह लोकप्रतिनिधीचे एक महिन्याचे एकूण ५० लाखांचे मानधन पूरग्रस्तांना दिले आहे.

राज्याचे प्रमुख म्हणून संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी आम्ही मांडलेल्या समस्या व सादर केलेल्या मागण्यांचा प्राधान्याने विचार करून, निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी मुख्यमंत्री तातडीने उपाययोजना करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान मागण्या केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. हसन मुश्रीफ, खा. सुनील तटकरे, आदी नेते उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सत्यजीतने फार ताणून न धरता, काँग्रेसचा सहयोगी म्हणून काम करावे”, अजित पवारांची इच्छा

Aprna

पंढरपूर मंगळवेढा फेरनिवडणुकीची मागणी राष्ट्रवादीने केली नाही, राष्ट्रवादीच्या लीगल सेलचे स्पष्टीकरण!

News Desk

“शरद पवारांना मी मोठे नेते म्हणून मानत नाही”!

News Desk