HW News Marathi
महाराष्ट्र

भारनियमनाविरोधात राष्ट्रवादीचा‘कंदील मेणबत्ती’ मोर्चा

महाराष्ट्रात भारनियमन (लोडशेडिंग) सुरु झाल्याचा निषेध करत राष्ट्रवादीने कंदील-मेणबत्ती मोर्चा काढला. राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी उस्मानाबाद येथील शिवाजी चौकात कंदील-मेणबत्ती मोर्चा काढून राज्य सरकारच्या निर्णयाचा तीव्र विरोध केला. सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका जनतेला बसला आहे. याचमुळे दिवाळी ऐन तोंडावर असताना जनतेला अंधारात रहावे लागत आहे, अशी टीकाही यावेळी राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली.

खरेतर परतीचा पाऊस समाधानकारक झाला आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडावर हसू फुलले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हिरावून घेण्यासाठीच राज्य सरकारने भारनियमन सुरू केले अशी टीका राणा जगजीतसिंह पाटील यांनी केली. रात्रीच्या वेळी वीज नसल्यामुळे लोकांना आणि शेतकऱ्यांना भारनियमनाचा त्रास सहन करावा लागतो आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन वाझे अटक प्रकरणात शरद पवार आणि अनिल देशमुख काय म्हणाले ?

News Desk

बीडमध्ये आक्रोश परिषदेद्वारे नुकसानाची दाहकता मांडणार – राजू शेट्टी

News Desk

मुंबईला विभाजीत करण्याच्या कॉंग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेची मुख संमती, आशिष शेलारांचा आरोप

News Desk