HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची ‘शिवस्वराज्य यात्रा’ स्थगित

मुंबई | संपूर्ण राज्यभरात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा भागात निर्माण झालेल्या भीषण पुरस्थितीमुळे येथील नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. या भीषण पूरस्थितीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अजूनही अनेकजण या पुरात अडकून पडले आहेत. दरम्यान, या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस मदतीसाठी पुढे सरसावले आहे. राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेली ‘शिवस्वराज्य यात्रा’ तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीकडून राज्यातील पूरग्रस्तांना ५० लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. त्याचप्रमाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार-आमदार आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार असल्याची घोषणा देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. “राष्ट्रवादीच्या वेल्फेअर संघातर्फे पहिला ट्रक ९ ऑगस्ट रोजी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जाणार आहे. त्यामध्ये औषधे, कपडे, बिस्कीटे असणार आहेत. इस्लामपूरमध्ये जवळपास ७२ हजार नागरिकांसाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. त्यांना लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा पुरवल्या जात आहेत”, असेही नवाब मलिक यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…वाटेला जाण्याएवढा त्यांचा पक्ष मोठा नाही”, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Aprna

पुणे मनपावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी तयारीला लागा !

News Desk

‘कडक शिस्तीचे प्रशासक’ उपमा देत जयंत पाटलांनी नव्या गृहमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा

News Desk